Homeडेली पल्ससहाराच्या ग्रामीण दावेदारांनी...

सहाराच्या ग्रामीण दावेदारांनी वापर करावा सामान्य सेवा केंद्रांचा!

खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात राहणाऱ्यांसाठी सहारा रिफंड पोर्टल, म्हणजेच सहकारी संस्था केंद्रीय निबंधक सहारा परतावा पोर्टलवर दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या वैध ठेवीदारांना परतावा मिळवण्याच्या प्रक्रियेत, CRCS- सहारा रिफंड पोर्टलवर त्यांचे दावे दाखल करण्यामध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSCs), अर्थात सामान्य सेवा केंद्र सहाय्य करतील. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी 18 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली येथे  https://mocrefund.crcs.gov.in  या सहकारी संस्था केंद्रीय निबंधक (CRCS)-सहारा रिफंड पोर्टलचा शुभारंभ केला.

देशभरातील 5.5 लाखांहून अधिक सामान्य सेवा केंद्रे इंटरनेट जोडणी, संगणक, प्रिंटर आणि स्कॅनर इत्यादी आवश्यक सुविधांनी सुसज्ज असलेल्या 300 पेक्षा जास्त ई-सेवा पुरवत आहेत. वैध ठेवीदार CRCS- सहारा रिफंड पोर्टलवर दावे दाखल करण्यासाठी आपल्या जवळच्या सामान्य सेवा केंद्राची मदत देखील घेऊ शकतील.

सहाराच्या वैध ठेवीदारांना गाव पातळीवरील उद्योजकांनी (VLEs) सहाय्य करावे अशी विनंती सामान्य सेवा केंद्रांनी (CSC-SPV) केली आहे, आणि लोकांना सामान्य सेवा केंद्रांच्या माध्यमातून आपले दावे दाखल करता यावेत, या दृष्टीने आपली प्रणाली सक्षम केली आहे. सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या वैध ठेवीदारांना दावे दाखल करता यावेत, यासाठी CRCS- सहारा रिफंड पोर्टल, विकसित करण्यात आले आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content