Thursday, January 23, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजरोहित पाटलांनी सार्थ...

रोहित पाटलांनी सार्थ केले आरआर आबांचे नाव..

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील तथा आरआर आबा आपल्या प्रभावी वक्तृत्त्वशैलीसाठी प्रसिद्ध होते. राज्याच्या विधानसभेत आर आर पाटील यांनी अनेकदा आपल्या प्रभावी भाषणांमधून सभागृहाची दाद मिळवली होती. नुकतीच पंचविशी गाठलेल्या त्यांच्या चिरंजीवांनी सोमवारी विधानसभेतील पहिले भाषण करताना थेट आर आर पाटलांची आठवण सर्वांना करून दिली आणि मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सभागृहाची दाद मिळवली.

आर आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पोटनिवडणुकीतून विधानसभेवर निवडून गेल्या. त्यानंतरच्या २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित वयाने लहान असल्याने सुमनताई पाटील पुन्हा विधानसभेवर निवडून गेल्या. मात्र, यावेळी २०२४च्या विधानसभा निवडणुकीतून रोहित पाटील पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.

आरआर

विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत मांडला होता. त्यावर भाषण करताना रोहित पाटील यांनी आपले विधानसभेतील पहिलेच भाषण गाजविले. नार्वेकर यांचे अभिनंदन करताना रोहित पाटील म्हणाले की, अध्यक्षमहोदय आपण एक वकील आहात आणि सभागृहात एक क्रमांकावर बसणाऱ्या वकिलांकडे (देवेन्द्र फडणवीस) आपले लक्ष असणारच आहे. पण मीही वकिली शिकत असल्याने तुम्ही माझ्यावरही लक्ष ठेवाल, अशी मी आशा करतो. रोहित पाटील यांच्या टिप्पणीला अध्यक्ष नार्वेकर आणि मुख्यमंत्री फणवीस यांच्यासह सर्वच सदस्यांनी दाद दिली.

मुख्यमंत्र्यांकडे निर्देश करत रोहित पाटील म्हणाले की, संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली एक ओळ मला आठवते. ती म्हणजे, अमृताहूनी गोड नाम तुझे देवा… पाटील पुढे म्हणाले की, तुमचे नाव गोड आहे. त्यावर आपल्या जागेवर बसल्याबसल्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी टिप्पणी केली की, अमृताहूनही गोड आहे… त्यावर पाटील म्हणाले की, त्यामुळेच तुम्ही तुमची गोड दृष्टी माझ्यावरही ठेवाल, हा मला विश्वास आहे.

रोहित पाटील यांच्या या टिप्पणीनंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

रोहित पाटील यांनी मोजक्याच शब्दांत भाषण केले. पण त्याचा ठसा त्यांनी उमटवला. त्यामुळेच सभागृह गाजवणाऱ्या आर आर पाटलांची सर्वांनाचा आठवण झाली.

Continue reading

हिवाळी अधिवेशनाच्या सहलीतून जनतेला नेमके काय मिळाले?

नागपूर कराराचे पालन करण्याची संविधानिक जबाबदारी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊन राज्य सरकारने पूर्ण केली पण विदर्भाच्या सर्वसामान्य नागरिकांना या सहा दिवसांच्या कामकाजातून नेमके काय मिळाले, हा प्रश्न नेहमीप्रमाणे अनुत्तरितच राहिला. कापूस, सोयाबीनला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळतो का, विदर्भातील किंवा...

बीड सरपंचांच्या हत्त्येची एसआयटी तसेच न्यायालयीन चौकशी

बीडमध्ये झालेल्या संतोषअण्णा देशमुख या सरपंचाच्या हत्त्येप्रकरणी पोलीस महानिरीक्षकांच्या एसआयटीद्वारे म्हणजेच विशेष चौकशी पथकाद्वारे चौकशी केली जाईल आणि या प्रकरणात गुन्हेगारीच्या इको-सिस्टिमसंदर्भात न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. या दोन्ही चौकश्या तीन...

बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो..

बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो.. महाराष्ट्रात सध्या राजकारणात काय चाललंय समजत नाही, कोण कुणाबरोबर जाईल आणि कोण नेमके कोणत्या पक्षात आहे, हे समजत नाही, अशी स्थिती आहे, ही तक्रार बरेचजण करतात. पण, मुळात गुंतागुंतीचे...
Skip to content