Homeचिट चॅटयंदाही श्री गणेशोत्सवावर...

यंदाही श्री गणेशोत्सवावर सरकारी निर्बंध!

राज्यातल्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने यंदाही श्री गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या धोरणानुसार सार्वजनिक श्री गणेशोत्सवात जास्तीतजास्त चार फूट तर घरगुती श्री गणेशोत्सवात जास्तीतजास्त दोन फूट असावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्य सरकारने आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. स्थानिक प्रशासनाचे मंडपविषयक धोरण कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सुसंगत असावे. गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. पारंपरिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू वा संगमरवर मूर्तींचा वापर करावा. मूर्ती शाडू वा पर्यावरणपूरक असावी. तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी किंवा कृत्रिम तलावांत करावे, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

उत्सवाकरीता देणग्या वा वर्गणी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहवे. आरोग्यविषयक, सामजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. विविध आजारांबाबतचे प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांचे काटेकोर पालन करावे. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनीप्रदूषणाबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

श्री गणेशाचे दर्शन ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक आदींद्वारे उपलब्ध करून देण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न व्हावा. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था व्हावी. दर्शनाला येणाऱ्या भाविकांकडून शारीरिक अंतर पाळले जाईल, याची काळजी घ्यावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर व्हावा. श्रींच्या आगमन वा विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करावी. विसर्जनस्थळी कमीतकमी वेळ थांबावे. लहान मुले, वरिष्ठ नागरिकांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे. घरगुती गणेशोत्सवाच्या मिरवणुका एकत्रितपणे काढण्यात येऊ नयेत. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरीता कृत्रिम तलाव उभारावेत, असेही शासनाने जाहीर केले आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content