Homeएनसर्कललडाखमध्ये कारगिल-झंस्कार रस्त्याचे...

लडाखमध्ये कारगिल-झंस्कार रस्त्याचे रुंदीकरण सुरू!

लडाखमध्ये राष्ट्रीय महामार्ग 301चा एक महत्त्वाचा भाग असलेल्या 230 किलोमीटर लांबीच्या कारगिल-झंस्कार रस्त्याचे नूतनीकरण आणि रुंदीकरण सुरू करण्यात आल्याचे केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

एका ट्विटच्या मालिकेत त्यांनी सांगितले की, 8 पॅकेजेसमध्ये विभागलेला हा विस्तृत प्रकल्प पॅकेज 5 मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे तर पॅकेज 6 आणि पॅकेज 7 या आर्थिक वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. या 3 पॅकेजेसमध्ये तब्बल 97.726 किमीचा समावेश असून त्यात 13 मोठे पूल, 18 छोटे पूल आणि 620 बॉक्स कल्व्हर्टचा समावेश आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

एका बाजूला खोल दरी आणि दुस-या बाजूला उंच टेकडी असलेला हा भूभाग अतिशय आव्हाने निर्माण करत आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रदेशातील अतिशय विपरित पर्यावरण, विरळ वनस्पती आणि ऑक्सिजनची कमी पातळी, तसेच अत्यंत थंड हवामान, यामुळे अडचणींमध्ये वाढ होते. निम्म्याहून अधिक भागामध्ये वस्ती आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटी नाही.

हा पट्टा पूर्ण झाल्यावर, सर्व हवामानासाठी अनुकूल असलेला हा रस्ता सैन्य तुकड्या आणि अवजड तोफांच्या वाहतुकीसाठी सोयीचा झाल्याने अतिशय महत्त्वाची पायाभूत सुविधा म्हणून काम करेल, असे गडकरी म्हणाले. त्याच्या सामरिक महत्त्वाव्यतिरिक्त या प्रकल्पामुळे या प्रदेशातील आर्थिक विकास आणि पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून सीमावर्ती प्रदेशात कार्यक्षम, समस्याविरहित आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून सजग वाहतूक व्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्याची वचनबद्धता प्रदर्शित होत आहे, असे गडकरी यांनी नमूद केले.

Continue reading

माऊलींच्या कृपेने आळंदीतच विठ्ठल दर्शन घडले!

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला...

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...
Skip to content