Homeएनसर्कललडाखमध्ये कारगिल-झंस्कार रस्त्याचे...

लडाखमध्ये कारगिल-झंस्कार रस्त्याचे रुंदीकरण सुरू!

लडाखमध्ये राष्ट्रीय महामार्ग 301चा एक महत्त्वाचा भाग असलेल्या 230 किलोमीटर लांबीच्या कारगिल-झंस्कार रस्त्याचे नूतनीकरण आणि रुंदीकरण सुरू करण्यात आल्याचे केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

एका ट्विटच्या मालिकेत त्यांनी सांगितले की, 8 पॅकेजेसमध्ये विभागलेला हा विस्तृत प्रकल्प पॅकेज 5 मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे तर पॅकेज 6 आणि पॅकेज 7 या आर्थिक वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. या 3 पॅकेजेसमध्ये तब्बल 97.726 किमीचा समावेश असून त्यात 13 मोठे पूल, 18 छोटे पूल आणि 620 बॉक्स कल्व्हर्टचा समावेश आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

एका बाजूला खोल दरी आणि दुस-या बाजूला उंच टेकडी असलेला हा भूभाग अतिशय आव्हाने निर्माण करत आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रदेशातील अतिशय विपरित पर्यावरण, विरळ वनस्पती आणि ऑक्सिजनची कमी पातळी, तसेच अत्यंत थंड हवामान, यामुळे अडचणींमध्ये वाढ होते. निम्म्याहून अधिक भागामध्ये वस्ती आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटी नाही.

हा पट्टा पूर्ण झाल्यावर, सर्व हवामानासाठी अनुकूल असलेला हा रस्ता सैन्य तुकड्या आणि अवजड तोफांच्या वाहतुकीसाठी सोयीचा झाल्याने अतिशय महत्त्वाची पायाभूत सुविधा म्हणून काम करेल, असे गडकरी म्हणाले. त्याच्या सामरिक महत्त्वाव्यतिरिक्त या प्रकल्पामुळे या प्रदेशातील आर्थिक विकास आणि पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून सीमावर्ती प्रदेशात कार्यक्षम, समस्याविरहित आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून सजग वाहतूक व्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्याची वचनबद्धता प्रदर्शित होत आहे, असे गडकरी यांनी नमूद केले.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content