Homeपब्लिक फिगरतळियेच्या ग्रामस्थांचे सांगतील...

तळियेच्या ग्रामस्थांचे सांगतील तेथे पुनर्वसन!

रायगड जिल्ह्यातल्या तळिये गावातल्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून दिली जातील व ते सांगतील तेथे त्यांचे पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकारतर्फे त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

कोकणातील पूरग्रस्त भागाच्या दौर्‍याचा प्रारंभ आज तळिये, या गावातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुरूकेला. देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्यासोबत होते.

या गावांतील परिस्थिती अतिशय भीषण आहे. पुरामुळे काही मृतदेह दोन-दोन किमीपर्यंत वाहून गेले आहेत. गावात झालेले नुकसानसुद्धा प्रचंड आहे. आज त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आमचे काही लोकप्रतिनिधी तातडीने येथे पोहोचले आणि त्यांनी प्रशासन लवकर पोहोचावे, असा प्रयत्न केला, असे फडणवीस यांनी यावेळी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले.

आज प्राधान्य लोकांना तातडीने मदत करण्याला असले पाहिजे आणि पुनर्वसनाकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. एनडीआरएफसह सार्‍याच यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनसुद्धा त्यांच्यासोबत काम करीत आहेत. या लोकांना एनडीआरएफचे अनुदानही मिळावे, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

ही वेळ कुणावर आरोप करण्याची किंवा तुलना करण्याची नाही. नागरिकांना मदत करणे आणि प्रशासनाच्या पाठिशी उभे राहण्याची ही वेळ आहे. भाजपाकडूनही शक्य ती तातडीची मादत पोहोचवी जात आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content