Homeपब्लिक फिगरतळियेच्या ग्रामस्थांचे सांगतील...

तळियेच्या ग्रामस्थांचे सांगतील तेथे पुनर्वसन!

रायगड जिल्ह्यातल्या तळिये गावातल्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून दिली जातील व ते सांगतील तेथे त्यांचे पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकारतर्फे त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

कोकणातील पूरग्रस्त भागाच्या दौर्‍याचा प्रारंभ आज तळिये, या गावातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुरूकेला. देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्यासोबत होते.

या गावांतील परिस्थिती अतिशय भीषण आहे. पुरामुळे काही मृतदेह दोन-दोन किमीपर्यंत वाहून गेले आहेत. गावात झालेले नुकसानसुद्धा प्रचंड आहे. आज त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आमचे काही लोकप्रतिनिधी तातडीने येथे पोहोचले आणि त्यांनी प्रशासन लवकर पोहोचावे, असा प्रयत्न केला, असे फडणवीस यांनी यावेळी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले.

आज प्राधान्य लोकांना तातडीने मदत करण्याला असले पाहिजे आणि पुनर्वसनाकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. एनडीआरएफसह सार्‍याच यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनसुद्धा त्यांच्यासोबत काम करीत आहेत. या लोकांना एनडीआरएफचे अनुदानही मिळावे, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

ही वेळ कुणावर आरोप करण्याची किंवा तुलना करण्याची नाही. नागरिकांना मदत करणे आणि प्रशासनाच्या पाठिशी उभे राहण्याची ही वेळ आहे. भाजपाकडूनही शक्य ती तातडीची मादत पोहोचवी जात आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content