Homeकल्चर +मुंबई मराठी पत्रकार...

मुंबई मराठी पत्रकार संघात उद्या ‘रागदारी स्वरलतेची’!

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ‘रागदारी स्वरलतेची’ या आगळ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन येत्या सोमवारी, दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या पत्रकार भवनात करण्यात आले आहे.

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत समीक्षक पं. अमरेंद्र धनेश्वर व मुक्ता रास्ते हे या कार्यक्रमात, लतादीदींच्या अजरामर चित्रपट गीतांमधील रागदारीच्या प्रात्यक्षिकांसह गीते सादर करतील. संदीप मिश्रा (सारंगी), मुक्ता रास्ते (तबला), जयंत नायडू (तानपुरा) हे कलाकार त्यांना साथसंगत करणार असून पद्मजा दिघे सूत्रसंचालन करतील. अवीट गोडीच्या या गीतांची पार्श्वभूमी, इतिहास आदींबाबतही रंजक माहिती यावेळी देण्यात येईल. काही गीते ध्वनीफितींच्या माध्यमातून दीदींच्या आवाजात ऐकविली जातील.

पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अजय वैद्य यांच्या संयोजनातून साकारलेला हा कार्यक्रम म्हणजे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना पत्रकार संघाने वाहिलेली भावांजली होय! आझाद मैदान (सीएसटी रेल्वे स्थानकानजिक) येथील पत्रकार भवनात होणारा हा रंगतदार कार्यक्रम सर्व जनतेसाठी विनामूल्य खुला आहे. सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे तसेच कार्यवाह संदीप चव्हाण यांनी केले आहे.

संपर्क- २२६२०४५१/२२७००७१५

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content