Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबईतल्या ट्रान्झिट कॅम्पमधल्या...

मुंबईतल्या ट्रान्झिट कॅम्पमधल्या समस्या महत्त्वाच्या!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या मुंबईतील विविध विभागांमध्ये शाखा संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यावर भर दिला जात आहे. या अभियानाच्या दौऱ्यादरम्यान वांद्रे येथील एक गृहप्रकल्प रखडल्याने तेथील स्थानिक नागरिक राहत असलेल्या ट्रान्झिट कॅम्पला भेट दिली. या दरम्यान तेथे राहणाऱ्या नागरिकांच्या होत असलेल्या दुरवस्थेचे भीषण वास्तव समोर आले. या ट्रान्झिट कॅम्पप्रमाणे इतर ठिकाणीही विविध ट्रान्झिट कॅम्पमध्ये सद्यस्थितीत काही लाख नागरिक राहत आहेत. त्यांच्या या समस्या सोडविणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

हे सर्व रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनाने धोरण राबविण्याची मागणी आपण मुख्यमंत्री महोदयांकडे केली असून त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेत आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हे सर्व रखडलेले प्रकल्प कशा पद्धतीने तत्काळ मार्गी लागतील याबाबत चर्चा करण्यात आली. 

मुंबईतील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडल्याने तेथील नागरिक दुरवस्था झालेल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत. या ट्रान्झिट कॅम्पची अवस्था अत्यंत वाईट असल्याने येथे शौचालयांची व्यवस्था करणे, आसपासच्या परिसराची स्वच्छता राखणे, तेथील नागरिकांना मुबलक पाणी देणे, यासारख्या उपयोजना राबविण्याच्या सूचना यावेळी पालिका आयुक्तांना दिल्या. या रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास व्हावा यासाठी शासनाने धोरण राबविणे गरजेचे आहे. यासाठी एमएमआरडीए, म्हाडा, सिडको, एमएसआरडीसी तसेच बीएमसी यासारख्या सरकारी संस्थांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. या संस्थांच्या मदतीने सरकारने हे सर्व रखडलेले प्रकल्प मार्गी लावावे यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोळीवाड्याच्या पुनर्विकासासाठी जे धोरण आखले जाणार आहे त्यावेळी स्थानिक कोळी बांधवांना विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे. स्थानिकांच्या सूचनांनुसार पुनर्विकास आराखडा तयार करावा अशा सूचना यावेळी आयुक्तांना दिल्या. त्याचप्रमाणे मुंबईतील काही भागांमध्ये आपला दवाखाना सुरू करणे, तेथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, सार्वजनिक शौचालयांची उभारणी करणे यासारख्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

मुंबईतील पर्यटनाचे आकर्षण केंद्र असलेल्या मरीन ड्राईव्हचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. यासाठी योग्य त्या उपायोजना राबविण्याच्या सूचना यावेळी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. या सुशोभिकरणासाठी काही संकल्पनाही यावेळी सुचविल्या. फोर्ट एरिया हा ‘हेरिटेज लूक’ असलेला विभाग आहे. त्यामुळे या भागाचे सुशोभिकरण त्याच पद्धतीने व्हायला हवे. यासाठी पाहिल्या टप्प्यात एशिऍटीक लायब्ररी ते हुतात्मा चौक या भागात हेरिटेज पद्धतीने सुशोभिकरण करण्यात येणार आहे, असेही यावेळी ठरविण्यात आले.

सर्वसामान्य मुंबईकरांशी निगडित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे काम महापालिका प्रशासनाने अग्रक्रमाने करावे अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावर योग्य पद्धतीने त्वरित अंमलबजावणी केली जाणार असल्याचे आश्वासन यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी दिले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content