पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी, 10 ऑगस्टला केरळच्या वायनाड भागातल्या आपदाग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत. मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे वायनाडमध्ये तीन गावं गाडली गेली होती. त्यामध्ये साधारणतः ४०० जणांचा मृत्यू झाला तर १५२हून जास्त लोक आजही बेपत्ता आहेत.
वायसेनेचे तसेच लष्कराचे जवान, राष्ट्रीय आपदा बचाव दलाचे (एनडीआरएफ), एसडीआरएफ तसेच इतर बचावयंत्रणांकडून आजही तेथे बचावकार्य सुरूच आहे. केरळ सरकारने आता या जवानांबरोबरच बेपत्ता असलेल्या लोकांचे नातेवाईक तसेच इतर लोकांचीही मदत याकामी घेतली आहे. अतिमुशळधार पावसामुळे वायनाड परिसारत ३१० हेक्टवरील फळबागा जवळजवळ नष्ट झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी आपल्या या दौऱ्यात या साऱ्या नुकसानीबरोबरच तेथील बचावकार्याचा आढावाही घेणार असल्याचे कळते.
दोनच दिवसांपूर्वी वायनाडचे खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच त्यांच्या भगिनी व काँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी वायनाडला भेट देऊन तिथल्या आपदग्रस्त भागातल्या लोकांशी बातचीत केली होती.