Homeन्यूज ॲट अ ग्लांसपंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वायनाडच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी, 10 ऑगस्टला केरळच्या वायनाड भागातल्या आपदाग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत. मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे वायनाडमध्ये तीन गावं गाडली गेली होती. त्यामध्ये साधारणतः ४०० जणांचा मृत्यू झाला तर १५२हून जास्त लोक आजही बेपत्ता आहेत.

वायसेनेचे तसेच लष्कराचे जवान, राष्ट्रीय आपदा बचाव दलाचे (एनडीआरएफ), एसडीआरएफ तसेच इतर बचावयंत्रणांकडून आजही तेथे बचावकार्य सुरूच आहे. केरळ सरकारने आता या जवानांबरोबरच बेपत्ता असलेल्या लोकांचे नातेवाईक तसेच इतर लोकांचीही मदत याकामी घेतली आहे. अतिमुशळधार पावसामुळे वायनाड परिसारत ३१० हेक्टवरील फळबागा जवळजवळ नष्ट झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी आपल्या या दौऱ्यात या साऱ्या नुकसानीबरोबरच तेथील बचावकार्याचा आढावाही घेणार असल्याचे कळते.

दोनच दिवसांपूर्वी वायनाडचे खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच त्यांच्या भगिनी व काँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी वायनाडला भेट देऊन तिथल्या आपदग्रस्त भागातल्या लोकांशी बातचीत केली होती.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content