Homeचिट चॅटप्रबोधन विद्या निकेतनमध्ये...

प्रबोधन विद्या निकेतनमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

मुंबईच्या मालाड येथील प्रज्ञा प्रबोधन संस्था संचालित प्रबोधन विद्या निकेतन शाळेत १५ जूनला शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सरस्वती पूजन, प्रार्थना करून फुले आणि चॉकलेट्स देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी हर्षला राऊत यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून जीवनात शिक्षण व शिस्तीचे महत्त्व उत्तमरीत्या पटवून दिले. आकांक्षा माने यांनी प्रबोधन विद्या निकेतन या शिक्षण प्रवाहाबाहेर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या शाळेचा इतिहास तसेच शिक्षकांची विद्यार्थ्यां विषयीची तळमळ, आस्था विद्यार्थ्यांना पटवून दिली. मनिषा घेवडे यांनी आयुष्यात एकाग्रता आणि चिकाटी यांचे महत्त्व विविध उदाहरणांनी पटवून दिले आणि ध्यानाचे प्रात्यक्षिकही घेतले.

प्रबोधन

जून महिना आला की चाहूल लागते  शाळा सुरू होण्याची. पूर्वी १३ जून रोजी सुरू होणारी शाळा अलिकडे १५ जून रोजी सुरू होत असते. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करत असतात. त्यांना विविध भेटवस्तू, स्वागताची रांगोळी, भोजन देऊन, शाळेच्या पहिल्या दिवशी विविध खेळ, स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून शाळेची आवड निर्माण होते, त्यालाच शाळा प्रवेशोत्सव असे म्हटले जाते.

आसपासच्या परिसरातील होतकरू, शिकण्याची इच्छा असणारे जे विद्यार्थी शाळेच्या तसेच शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत, त्यांनी जरूर संपर्क साधावा असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रविणा वाडेकर तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक पटेल, सचिव विजय मांडाळकर आणि खजिनदार प्रभाकर देसाई यांनी केले.

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content