Homeमाय व्हॉईसपावरलूम कामगारांनाही मिळणार...

पावरलूम कामगारांनाही मिळणार निवृत्तीवेतन!

पावरलूम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची इच्छा राज्य सरकार बाळगून असून त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

आज जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं धुळे येथील मारिया हॉलमध्ये यंत्रमाग (लूम) कामगार मेळावा पार पडला. या कार्यक्रमात मुस्लिम बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्य सरकारनं टेक्स्टस्टाईलसंदर्भात काही हितकारी निर्णय घेतले आहेत. पण, त्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली

नाही. या अंमलबजावणीसाठी बैठक आयोजित करण्यात आली असून लवकरच निर्णय घेऊन पुढची पावलं उचलली जातील, असे ते म्हणाले.

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे भाग भांडवल ६० कोटींवरून ५०० कोटींवर नेले. मंडळाला अल्पसंख्याकांच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये राज्य सरकारनं दिलेत. आम्ही धर्मनिरपेक्षता मानणारे लोक आहोत. आम्ही शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे लोक आहोत. अल्पसंख्याक समाजासाठी दफनभूमीच्या कंपाऊंड वॉलचं काम, लग्न समारंभाच्या हॉलचं काम सरकारनं पूर्ण केलं आहे. आमचे सरकार हे कायमच अल्पसंख्याकांच्या हिताची भूमिका घेत राहील, असेही पवार म्हणाले.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content