Homeडेली पल्सबिबट्यांना पळवायचंय, गाणी...

बिबट्यांना पळवायचंय, गाणी लावा…

बिबट्या आला तर रोडिओवर गाणी लावा… म्हणजे बिबट्या पळून जातो, असा सल्ला वन अधिकारी देतात, अशी तक्रार एका आमदाराने काल विधानसभेत केली. त्यावरून संतप्त झालेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गाणं म्हणून बिबट्या पळून जात नाही, हे स्पष्टपणे सांगितले. पण, तसे सांगताना लक्षवेधी सूचना कोणीतरी मांडल्यावर वनअधिकाऱ्यांचा हा सल्ला वनमंत्र्यांना विधानसभेत ऐकवण्याची वाट बघू नका. हा सल्ला मिळाल्यामिळाल्या आपल्या लेटरहेडवर एक पत्र लिहून वनमंत्र्यांना म्हणजे मला पाठवा म्हणजे मी तसा सल्ला देणाऱ्या वनअधिकाऱ्यांना गाणी ऐकायला मिळतील, अशा ठिकाणी पाठवतो, असे मुनगंटीवार यांनी सांगताच सभागृहात हंशा उसळला.

तुम्ही आमदारांनी अशा गोष्टी वेळच्या वेळी सांगितल्या नाहीत तर मग राज्याच्या विकासाचेच गाणे झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टिप्पणीही वनमंत्र्यांनी केली.

गाणी

एका आमदाराने शेजारील राज्यातून हत्ती महाराष्ट्रात येतात आणि पिके नष्ट करतात, असे सांगितले. त्यावर छत्तीसगड किंवा कर्नाटकसारख्या शेजारील राज्यातून हत्तीही महाराष्ट्रात येतात, इतका विकास माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सरकारने २०१४ ते २०१९मध्ये केलेला आहे, अशी टिप्पणी मुनगंटीवार यांनी केली. अर्थात, गंमतीचा भाग सोडून त्यांनी या सर्व संकटांवर सरकार करीत असलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी मुनगंटीवार यांच्या या उत्तरांना आणि असे व्हायला उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस जबाबदार आहेत, असे विधान केले. त्यावर सभागृहातील सर्वांनाच प्रश्न पडला आणि फडणवीस यांनी मुनगंटीवार यांना वनमंत्री तसेच सांस्कृतिक कार्यमंत्रीही केलेले असल्यामुळे त्यांना वनअधिकारी गाणी ऐकवण्याचा सल्ला देत आहेत, अशी टिप्पणी केली आणि सभागृह पुन्हा हास्यकल्लोळात बुडाले.

Continue reading

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...
Skip to content