Homeब्लॅक अँड व्हाईटपेटीएमचे एनएफसी कार्ड...

पेटीएमचे एनएफसी कार्ड साऊंडबॉक्स लाँच

भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्यूआर आणि मोबाईल पेमेंट्सची अग्रणी असलेल्या पेटीएमने भारतातील पहिले ‘पेटीएम एनएफसी कार्ड साऊंडबॉक्स’ लाँच केले आहे. हे पुढील पिढीचे पेमेंट डिव्हाईस एनएफसी तंत्रज्ञान आणि मोबाईल क्यूआर पेमेंट्स एकत्र करते, जे लाखो ऑफलाईन व्यापाऱ्यांना कार्ड पेमेंटसाठी सुलभ डिव्हाईस प्रदान करेल.

पेटीएमचे नवीन एनएफसी कार्ड साऊंडबॉक्स एनएफसी कार्ड पेमेंट तंत्रज्ञानासह मोबाईल पेमेंट्समध्ये पुढील सुविधा चिन्हांकित करते. हे छोटे दुकानदारांना सुरक्षित एनएफसी कार्ड-रीडिंग तंत्रज्ञान वापरण्यास सक्षम बनवते. त्यामुळे ते क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आणि युपीआयसह व्यापक पेमेंट स्वीकारू शकतात. ग्राहक कार्ड टॅप करून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देऊ शकतात.

पेटीएम

१० दिवसांपर्यंत सुधारित आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीबरोबर, व्यापारी वारंवार चार्जिंग न करता पेटीएम एनएफसी कार्ड साऊंडबॉक्सचा लाभ घेऊ शकतात. त्वरित ऑडिओ पुष्टीकरण आणि व्यवहाराच्या रकमेसाठी डिस्प्ले स्क्रीनसह त्याच्या कोर फीचर्सशिवाय, हे नाविन्य व्यापाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन व्यवहार सुलभ करण्यास मदत करते. त्यामुळे त्यांचे व्यवसाय ऑपरेशन्स अधिक कार्यक्षम आणि खर्च कमी होतात.

पेटीएमचे प्रवक्ते म्हणाले की, आम्ही भारतातील लहान व्यापाऱ्यांना नवीनतम तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन सर्व प्रकारच्या पेमेंट स्वीकारण्यासाठी सुलभ किंमतीत मदत करण्यास बांधील आहोत. आजचे ‘एनएफसी कार्ड साऊंडबॉक्स’चे लाँच पेटीएम साउंडबॉक्सच्या नाविन्याचा पुढील टप्पा आहे, जे भारतातील सर्वात प्रिय आणि यशस्वी पेमेंट डिव्हाईस आहे. पेटीएम एनएफसी कार्ड साऊंडबॉक्ससह, व्यापारी कोणत्याही युपीआय अ‍ॅपमधून मोबाईल पेमेंट आणि एकाच डिव्हाईसद्वारे एनएफसीआधारित डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारू शकतात.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content