Homeब्लॅक अँड व्हाईटपेटीएमचा पेमेंट्स व्‍यवसाय...

पेटीएमचा पेमेंट्स व्‍यवसाय वाढवण्यावर भर

पेटीएम ही भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्‍यूआर, साऊंडबॉक्स व मोबाईल पेमेंट्सच्‍या अग्रणी कंपनीने गुरूवारी आपल्‍या २४व्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम)मध्‍ये अनुपालनकेंद्रित दृष्टिकोनासह लाभक्षमतेप्रती कटिबद्धतेची पुष्‍टी दिली. कंपनीने आपल्‍या मुलभूत पेमेंट्स व्‍यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे.

एजीएममध्‍ये पेटीएमचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर शर्मा यांनी क्‍यूआर कोड व साऊंडबॉक्‍स यासारख्‍या कंपनीच्‍या अग्रगण्‍य नाविन्‍यतांच्‍या माध्‍यमातून भारतातील डिजिटल पेमेंट्स क्रांतीमध्‍ये पेटीएमच्‍या मोठ्या भूमिकेला दाखवले. ते म्‍हणाले की, आम्‍ही भारतातील व्‍यवसाय आणि लघु व्‍यापाऱ्यांसाठी नेहमी जागतिक दर्जाचे उत्‍पादन निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, त्यासाठी जागतिक बेंचमार्क स्‍थापित करत आहोत. आज, आमचा व्‍यवसाय जागतिक स्‍तरावर अनुकरणीय टेम्प्लेट बनला आहे. टीम आर्टिफिशियल इंटेलिजन्‍समध्‍ये तेच यश संपादित करण्‍यास सज्‍ज आहे. आमची टीम तंत्रज्ञान, उत्‍पादन, व्‍यवसाय आणि कार्यसंचालन या सर्व क्षेत्रांमध्‍ये एआयचा वापर करत आहे.

पेटीएमने आपला व्‍यापारीवर्ग विस्‍तारित करण्‍यावर लक्ष केंद्रित केले असून सध्‍या जवळपास ४० दशलक्ष व्‍यापाऱ्यांना सेवा देत आहे. देशभरातील १०० दशलक्ष व्‍यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्‍याचे त्यांचे ध्‍येय आहे. अध्‍यक्ष व ग्रुप सीएफओ मधुर देवरा यांनी अर्ध-बिलियन भारतीयांना मुख्‍य प्रवाहातील अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये आणण्‍याच्‍या पेटीएमच्‍या मिशनला सादर केले. त्‍यांनी ८,५०० कोटी रूपयांच्‍या रोख शिल्‍लकीसह प्रबळ ताळेबंदाचा उल्‍लेख करत कंपनीची आर्थिक स्थिती निदर्शनास आणली.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content