Homeटॉप स्टोरीमुंबईत पाण्याचे बिल...

मुंबईत पाण्याचे बिल भरा ३१ मार्चपर्यंत!

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या जल देयकांचे (Water Bills) अधिदान हे जलदेयकाच्या दिनांकापासून एका महिन्यात अदा करणे बंधनकारक असून एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त आकारणी केली जाते. तथापि, या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्‍यासाठी ‘अभय योजना’ गेल्या वर्षी, २०२०मध्ये सुरू करण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०२० ही या योजनेची अंतिम तारीख होती. मात्र, या योजनेला प्राप्त होत असलेला नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद लक्षात घेत, आता या योजनेला येत्या नवीन वर्षात ३१ मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेद्वारे आपल्या क्षेत्रातील सव्वा कोटींपेक्षा अधिक नागरिकांना दररोज सरासरी ३ हजार ८५० दशलक्ष लीटर (३८५ कोटी लीटर) पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. देशातील सर्वात शुद्ध आणि पुरेसे पाणी पुरविणारी महानगरपालिका, असा लौकिक असणारी बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरेशा प्रमाणात मिळावे, यासाठी महापालिका नियमित प्रयत्नशील असते.

एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त आकारणी केली जाते. देयकाच्या रकमेवर साधारणपणे दर महिन्याला २ टक्के यानुसार ही आकारणी केली जाते. तथापि, या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्‍यासाठी ‘अभय योजना सुरू करण्यात आली आहे.

सर्व जल-जोडणी ग्राहकांना असे आवाहन करण्‍यात येत आहे की, त्‍यांनी त्‍यांच्‍या प्रलंबित जल देयकातील (Outstanding Water Bill) जलआकार, मलनिःसारण आकार आणि‍ जलमापक भाडे यांचे एकरकमी अधिदान (Payment) करुन तसेच अभय योजनेच्‍या कालावधीत निर्गमित झालेल्‍या सर्व जल देयकांचे अधिदान ३१ मार्च २०२१ पूर्वी करुन या योजनेचा लाभ घ्‍यावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्‍या संबंधित विभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता (जलकामे) (Assistant Engieer, Water Works) यांच्‍याशी संपर्क साधावा व जास्‍तीतजास्‍त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे.

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content