Homeटॉप स्टोरीमुंबईतली पासपोर्ट कार्यालये...

मुंबईतली पासपोर्ट कार्यालये आजपासून बंद!

महाराष्ट्राच्या “ब्रेक द चेन” उपक्रमाचा भाग म्हणून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईच्या क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाने आज, दि. 23.04.2021पासून सर्व पासपोर्ट कार्यालय केंद्रे (पीएसकेएस) आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे (पीओपीकेएस)चे कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय महाराष्ट्र सरकारने कोरोना संक्रमण रोखण्याच्या संदर्भात जारी केलेला आदेशानुसार आहे. या आदेशानुसार तारीख 22.04.2021 च्या रात्री 8 पासून ते 01.05.2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात सामान्य कामांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, मुंबई अंतर्गत असलेल्या सर्व पीएसके (PSK) आणि पीओपीएसके (POPSK)मधील सेवा आणि क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मुंबई येथील चौकशी काउंटर 30.04.2021पर्यंत बंद राहतील.

सर्व अर्जदार, ज्यांनी आधीच त्यांच्या भेटीची वेळ निश्चित केली आहे, त्यांना सेवा प्रदाता कंपनी टीसीएसद्वारे एसएमएसद्वारे सूचित केले जात आहे. तथापि, सर्व अर्जदारांना कळवण्यात येते की, दिनांक 23.04.2021 ते 01.05.2021पर्यंत या कार्यालयाच्या कोणत्याही पासपोर्ट सेवा केंद्रात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तेव्हा त्यांनी कोणत्याही पीएसके/पीओपीएसकेला भेट देऊ नये.

अर्जदार क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, मुंबई या कार्यालयात दूरध्वनीद्वारे (022-26520016/17) संपर्क करू शकतात किंवा कोणत्याही माहितीसाठी इमेल (rpo.mumbai@mea.gov.in)द्वारे संपर्क साधू शकतात.  तसेच वेबसाइट www.passportindia.gov.in / ट्विटर हैंडल (@rpomumbai) किंवा क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाच्या फ़ेसबुक पेजच्या माध्यमातून पासपोर्ट कार्यालयाशी संपर्क साधता येईल.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content