Homeन्यूज अँड व्ह्यूजजरांगेंप्रमाणे हाकेंच्या आंदोलनालाही...

जरांगेंप्रमाणे हाकेंच्या आंदोलनालाही आमचा पाठिंबा

ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा होता तसाच लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने लेखी आश्वासन द्यावे अशी हाके यांची मागणी आहे. याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली.

महायुती सरकारने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महापाप केले आहे. मराठवाड्यात सरकारी धोरणांमुळे ओबीसी विरुद्ध मराठा वाद विकोपाला गेला. दुहीचे राजकारण करणाऱ्या सरकारने यावर तोडगा काढावा. दोन्ही समाजाचे समाधान होण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे सरकारने जातनिहाय जनगणना करावी, ही आमची मागणी आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहले असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज्यभरात बुधवारपासून पोलीस भरती सुरू होणार आहे. १७ हजार  जागांसाठी १७ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. ही पोलीस भरती अनेक वर्षांनी होत आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या प्रचंड आहे. मात्र एका उमेदवाराला पाच ठिकाणी अर्ज करण्याचा पर्याय दिल्याने उमेदवार कसे उपस्थित राहतील,  याचे सरकारला भान असले पाहिजे .काही ठिकाणी उन्हाचा तडाखा आहे तर काही ठिकाणी पाऊस आहे. याचा फटका पोलीस भरतीतील उमेदवारांना बसू नये. याची खबरदारी सरकारने घ्यावी. भरतीप्रक्रिया होणाऱ्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा द्याव्यात, असेही ते म्हणाले.

 दरवर्षी नीट परीक्षेला देशभारातून २५  लाख विद्यार्थी बसतात. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी दिवसरात्र मेहनत करत असतात. यावेळी पहिल्यांदा देशातील ६७ विद्यार्थी ७२०पैकी ७२० गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. गुजरातच्या गोध्रा शहरातील जय जलाराम स्कूल या शाळेमधील ‘नीट’ परीक्षेचे केंद्र मिळवण्यासाठी तर तब्बल १० लाख रुपयांची बोली लागली होती. गुजरातप्रमाणे हरियाणा आणि बिहारमधील घोटाळ्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content