Homeचिट चॅटआमची एसएससी आता...

आमची एसएससी आता ज्येष्ठ नागरिकांच्या कळपात!

गोष्ट खरी आहे की आमची एसएससी आता साठ वर्षांची झाली. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांच्या कळपात आली. काय म्हणता? नीट कळलं नाही? जरा सविस्तर सांगा की राव! म्हणजे असं झालं की आम्ही SSC (एसएससी), माध्यमिक शालांत परीक्षेसाठी शाळेतून बाहेर पडलो त्या गोष्टीला आज साठ वर्षे पूर्ण होत आहेत.

कारण आमची एसएससीची बॅच ही १९६४ची. मात्र आता आम्ही “म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वयमान”! थोडक्यात सांगायचं तर आम्ही मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत १९६४ साली ११-अ या वर्गात होतो. म्हणूनच २०१४ साली आम्ही सारे जण एकत्र येऊन आमच्या एसएससीची पन्नाशी अर्थात सुवर्ण महोत्सव खूप उत्साहाने साजरा केला. या घटनेस आजमितीस ६० वर्ष पूर्ण झाली आहेत.

सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानंतरसुद्धा आम्ही (‘अ’ वर्गातील मुले-मुली) नित्यनेमाने अधूनमधून स्नेहसंमेलन घडवीत असतो. असेच एक स्नेहसंमेलन गतसाली ऑक्टोबर महिन्यात मिलिंद सामंततर्फे विलेपार्ले‌ येथे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी, १० फेब्रुवारीला मोहन पराडकरने आपल्या निवासस्थानी आयोजित केले. या आमच्या स्नेहसंमेलनास १८-१९ जण येणारे होते. परंतु सर्वांचीच आता पंच्याहत्तरी सरली असल्याने वैयक्तिक, अपरिहार्य कारणामुळे काही जण येऊ शकले नाहीत. पर्यायाने आम्ही ११ जणच उपस्थिती देऊ शकलो.

असं असले तरी सारा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि एकमेकांसह गप्पागोष्टीत छानपणे रंगला. तो आनंद नक्कीच स्वागतार्ह होता. दुपारच्या सत्रात खास ऑर्डर देऊन बनवून घेतलेल्या उत्तम जेवणाचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला. सायंकाळी चहापान झाल्याने छान तरतरी आली. याप्रसंगी रवी ठाकूरने आपले पुढले स्नेहसंमेलन एप्रिलमध्ये करण्याचे सूतोवाच करून सर्वांना सुखद धक्का दिला. त्याच्या अर्धांगिनीनेदेखील याला दुजोरा दिला. म्हणजे तीन महिन्यानंतर पुन्हा सर्वांची गाठभेट होऊन या संख्येत उत्तम भर पडेल अशी आशा आहे. मात्र, मोहनकडील कार्यक्रम अतिशय सुंदर, खास आठवणीत राहण्यासारखा घडला हे नमूद केलेच पाहिजे.

– अशोक मोहिले, माहीम

Continue reading

आता विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांतच मिळणार एसटीचे पास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यामुळे आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी...

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढच्या २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदूर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या...

पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या परदेशवारीसाठी रवाना

पाकिस्तानवरच्या लष्करी कारवाईनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याकरीता रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेटी देतील. येत्या ते 19 जूनला पंतप्रधान मोदी मायदेशी परततील. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन...
Skip to content