Wednesday, January 15, 2025
Homeचिट चॅटआमची एसएससी आता...

आमची एसएससी आता ज्येष्ठ नागरिकांच्या कळपात!

गोष्ट खरी आहे की आमची एसएससी आता साठ वर्षांची झाली. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांच्या कळपात आली. काय म्हणता? नीट कळलं नाही? जरा सविस्तर सांगा की राव! म्हणजे असं झालं की आम्ही SSC (एसएससी), माध्यमिक शालांत परीक्षेसाठी शाळेतून बाहेर पडलो त्या गोष्टीला आज साठ वर्षे पूर्ण होत आहेत.

कारण आमची एसएससीची बॅच ही १९६४ची. मात्र आता आम्ही “म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वयमान”! थोडक्यात सांगायचं तर आम्ही मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत १९६४ साली ११-अ या वर्गात होतो. म्हणूनच २०१४ साली आम्ही सारे जण एकत्र येऊन आमच्या एसएससीची पन्नाशी अर्थात सुवर्ण महोत्सव खूप उत्साहाने साजरा केला. या घटनेस आजमितीस ६० वर्ष पूर्ण झाली आहेत.

सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानंतरसुद्धा आम्ही (‘अ’ वर्गातील मुले-मुली) नित्यनेमाने अधूनमधून स्नेहसंमेलन घडवीत असतो. असेच एक स्नेहसंमेलन गतसाली ऑक्टोबर महिन्यात मिलिंद सामंततर्फे विलेपार्ले‌ येथे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी, १० फेब्रुवारीला मोहन पराडकरने आपल्या निवासस्थानी आयोजित केले. या आमच्या स्नेहसंमेलनास १८-१९ जण येणारे होते. परंतु सर्वांचीच आता पंच्याहत्तरी सरली असल्याने वैयक्तिक, अपरिहार्य कारणामुळे काही जण येऊ शकले नाहीत. पर्यायाने आम्ही ११ जणच उपस्थिती देऊ शकलो.

असं असले तरी सारा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि एकमेकांसह गप्पागोष्टीत छानपणे रंगला. तो आनंद नक्कीच स्वागतार्ह होता. दुपारच्या सत्रात खास ऑर्डर देऊन बनवून घेतलेल्या उत्तम जेवणाचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला. सायंकाळी चहापान झाल्याने छान तरतरी आली. याप्रसंगी रवी ठाकूरने आपले पुढले स्नेहसंमेलन एप्रिलमध्ये करण्याचे सूतोवाच करून सर्वांना सुखद धक्का दिला. त्याच्या अर्धांगिनीनेदेखील याला दुजोरा दिला. म्हणजे तीन महिन्यानंतर पुन्हा सर्वांची गाठभेट होऊन या संख्येत उत्तम भर पडेल अशी आशा आहे. मात्र, मोहनकडील कार्यक्रम अतिशय सुंदर, खास आठवणीत राहण्यासारखा घडला हे नमूद केलेच पाहिजे.

– अशोक मोहिले, माहीम

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content