Homeकल्चर +.. अन्यथा जयंत...

.. अन्यथा जयंत एक धाडसी संपादक झाला असता!

जयंत पवार यांचा नाटक-कथाकार म्हणून लौकिक झाला असेलही. परंतु त्यांची नजर पत्रकाराची होती. संधी मिळाली असती तर ते एक धाडसी पत्रकार झाले असते, अशी खंत जयंत पवार यांच्या पत्नी संध्या नरे-पवार यांनी व्यक्त केली.

जयंत पवार यांच्या अभिवादन सभेत त्यांनी ही खंत उघडपणे व्यक्त केली. लोकवाङ्मय गृह आणि विद्रोही चळवळीतर्फे ही अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. लोकवाङ्मय गृहाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या अभिवादन सभेस सर्व थरातील लोक उपस्थित होते. डावे होते, उजवे होते, विद्रोही होते, जयंतचे मित्र होते, चाहते होते, पत्रकार मित्र होते, कोण नव्हते तेव्हडे विचारा.. विशेष म्हणजे जयंतचे विचार आवडणारा युवावर्गही मोठया संख्येने उपस्थित होता.

या अभिवादन सभेस उपस्थित असणाऱ्यांनी जयंतकडे वेगळी नजर होती.. असा आवर्जून उल्लेख केला. खरेतर ती नजर पत्रकाराची होती म्हणून तर त्याला वेगळा विचार सुचत असे आणि त्याबरहुकूम तो लिहीत असे. त्याच्यातील समीक्षक, नाटक-कथाकाराला जितके उचलून धरले गेले तितकेच त्याच्यातील पत्रकाराला डावलले गेले असे मला सतत वाटत आले आहे, अशी जाहीर खंत त्यांनी व्यक्त केली.

साहित्यिक व नाटक वर्तुळात वावरणाऱ्या जयंतच्या वाटेस एखादे सदरही येऊ नये का? असा रास्त सवाल त्यांनी संबंधितांना विचारला. गेली काही वर्षे कर्करोगाशी सामना करताना ज्या मित्रांनी वेळोवेळी सहाय्य केले त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. पुरस्कार वापसीच्या वेळी जयंतने स्वीकारलेल्या भूमिकेमुळे जवळच्या मित्रांनीही केलेल्या टीकाटिप्पणीबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

रंगकर्मी मंगेश कदम व विजय केंकरे यांनी जयंतच्या मैत्रीसंदर्भात काही आठवणी सांगितल्या. कोणाला कोणती भूमिका सूट होईल हे जयंत अचूक ओळखत असे, या शब्दात मंगेश कदम यांनी आदर व्यक्त केला. ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांनी आपल्या जिवलग मित्राबाबत काही आठवणी सांगितल्या. जयंत शांत बसून काहीही ऐकून घेत असे, हे आपल्याला बिलकुल आवडत नसे, असे समर यांनी स्पष्ट केले. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनीही आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्याला आदरांजली वाहिली. ज्येष्ठ रंगकर्मी शहाफत खान यांनीही जयंतच्या नाट्यलेखनाचा गौरव केला. लोकवाङ्मय गृहाचे राजन बावडेकर यांनी समारोप केला.

लोककवाङ्मय गृहाने अलीकडच्या काळात आयोजित केलेल्या चांगल्या कार्यक्रमांपैकी हा एक कार्यक्रम ठरावा. (कोरोना काळात कार्यक्रम बंद होते. परंतु त्याआधीचा काळ गृहीत धरला आहे. चुकभूल द्यावी घ्यावी.)

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content