Homeब्लॅक अँड व्हाईटस्वातंत्र्यदिनानिमित्त टपाल कार्यालयांतही...

स्वातंत्र्यदिनानिमित्त टपाल कार्यालयांतही होणार राष्ट्रध्वजाची विक्री!

देशवासियांच्या हृदयात राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्यासाठी आणि हा जोम आणि देशभक्तीची भावना यांचा अशाच प्रकारे अविष्कार करण्यासाठी, भारत सरकार यावर्षी देखील 13-15 ऑगस्ट 2023 या काळात हर घर तिरंगा अभियानाचे आयोजन करत आहे. या अभियानाला पाठबळ देण्यासाठी देशातील 1.6 लाख टपाल कार्यालयांच्या जाळ्याचा उपयोग करुन घेण्याचा आणि या अभियानाअंतर्गत देशातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज उपलब्ध होतील याची खात्री करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टपाल कार्यालयांमध्ये लवकरच राष्ट्रध्वजांची विक्री सुरु होईल आणि नागरिकांना त्यांच्या जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन ध्वज खरेदी करता येतील. नागरिकांना टपाल खात्याच्या www.epostoffice.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावरील ई-टपाल सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची खरेदी करता येईल.

भारताच्या वाटचालीबाबत अभिमान जागृत करण्यासाठी केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या (एकेएएम) अंतर्गत हर घर तिरंगा अभियान सुरु केले. वर्ष 2022 मध्ये देशातील 23 कोटी घरांतील नागरिकांनी घरावर प्रत्यक्ष स्वरुपात तिरंगा फडकवला तर सहा कोटी लोकांनी एचजीटी संकेतस्थळावर त्यांचे सेल्फी फोटो अपलोड करुन हे अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी केले. टपाल विभागाने (डीओपी) हे अभियान देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आणि देशाच्या अत्यंत दुर्गम कोपऱ्यात देखील राष्ट्रध्वज उपलब्ध होईल याची सुनिश्चिती केली.

राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या या कार्यक्रमाशी देशातील नागरिक जोडले जावेत या उद्देशाने टपाल कार्यालये विविध जागरुकता उपक्रम (लोकसहभागविषयक कार्यक्रम) देखील आयोजित करणार आहेत. नागरिकांना या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन नव्या भारताच्या या महान कार्यक्रमाचा भाग होता येईल.

नागरिक त्यांच्या घरावर तसेच कार्यालयांवर फडकवलेल्या राष्ट्रध्वजासह सेल्फी फोटो काढून #IndiaPost4Tiranga, #HarGharTiranga, #HarDilTiranga या हॅशटॅगसह समाजमाध्यमांवर अपलोड करू शकतील.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content