Homeटॉप स्टोरीआता शाळकरी मुलांची...

आता शाळकरी मुलांची निघणार वैद्यकीय सहल!

महाराष्ट्रात झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी शाळा चालूच ठेवून त्यांच्या वैद्यकीय सहली काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्दीमाध्यमांना ही माहिती दिली. राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाने जोरदार उसळी घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातल्या कोरोनाचे संक्रमण जवळजवळ दुपट्टीने वाढले आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सबरोबर सविस्तर बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने नुकतेच १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. ही मोहीम राबविताना शाळा बंद ठेवायच्या नाहीत. शाळेत जाऊनही त्यांचे लसीकरण करायचे नाही. त्यापेक्षा त्यांना वाहनातून लसीकरण केंद्रांवर न्यायचे आणि त्यांचे लसीकरण करायचे, अशा धोरणाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात पहिल्या डोससाठी जवळजवळ ९० टक्के लसीकरण झाले आहे. दुसऱ्या डोससाठी साधारण ५७-५८ टक्के लसीकरण झाले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय सर्वेक्षणात फार कमी लसीकरण झाले आहे अशा जिल्ह्यांमध्ये लसीकरण बंधनकारक करण्याकरीता तेथील प्रशासनाची येत्या दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल, असेही टोपे म्हणाले.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणते नवे निर्बंध लावायचे याचा निर्णय मुख्यमंत्री उद्यापर्यंत घेतील. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची चाचणी करण्यासाठी येत्या १० ते १५ दिवसांत एसजीटीएफ किटचा वापर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने तशी सूचना केली आहे. या किटच्या वापराने ओमिक्रॉनचे रूग्ण ओळखण्यास मदत होईल. उपचारासाठी नव्याने निघालेल्या गोळीचा वापर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

उद्याच्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जनतेने गर्दी निर्माण होईल, असे कोणतेही कार्यक्रम हाती घेऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content