Homeब्लॅक अँड व्हाईटकठुआत साकारणार उत्तर...

कठुआत साकारणार उत्तर भारतातले पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय

उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील जसरोटा भागात उभारले जाईल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल कठुआ येथे दिली. केंद्र सरकारच्या निधीतील 80 कोटी रुपये खर्च करून हे महाविद्यालय उभारले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सातत्याने विकासाची वाटचाल सुरू ठेवत डॉ. सिंह यांनी जसरोटा गावातील महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेला भेट दिली. सध्या या जागेवर कुंपण भिंतीचे काम सुरू झाले आहे. यावेळी आयुष विभागातील अभियंते आणि वरिष्ठ तज्ञांनी मंत्र्यांना संस्थेबाबत माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर या महाविद्यालयाची मागणी मांडली होती, असे त्यांनी सांगितले. 70-80 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले, उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय कठुआच्या लोकांसाठी अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले. ही संस्था 8 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रफळावर विस्तारित असून शेजारील तीन एकर क्षेत्रदेखील योग्य वेळेत महाविद्यालयाच्या जागेबरोबर जोडले जाईल, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content