Homeडेली पल्सनिलगिरी श्रेणीतले ‘तारागिरी’...

निलगिरी श्रेणीतले ‘तारागिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात

माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडद्वारे बांधलेले निलगिरी श्रेणीतले (प्रकल्प 17अ)मधले चौथे जहाज ‘तारागिरी’ मुंबईत माझगाव डॉक येथे झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय नौदलाकडे समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आले. युद्धनौकेच्या डिझाइन आणि बांधकामातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने झालेले हे आणखी एक मोठे पाऊल आहे. प्रकल्प 17अ फ्रिगेट्स ही बहुमुखी मोहिमांसाठी तयार केलेली जहाजे असून सागरी क्षेत्रातल्या सध्याच्या आणि भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे.

तारागिरी, हे पूर्वीच्या आयएनएस तारागिरीचे नवे रूप आहे. ते एक लिएंडर-क्लास फ्रिगेट होते जे 16 मे 1980 ते 27 जून 2013 या कार्यकाळात भारतीय नौदलाच्या ताफ्याचा भाग होते. तब्बल 33 वर्षे त्याने देशासाठी गौरवशाली सेवा दिली. नव्या पिढीचे हे अत्याधुनिक जहाज नौदल डिझाइन, स्टेल्थ, अग्निशक्ती, स्वयंचलन आणि टिकाऊपणाच्या क्षमतेतील एक मोठी झेप मानली जाते. वॉरशिप डिझाइन ब्युरो यांनी याचे डिझाइन केले असून युद्धनौकेची देखरेख मुंबईच्या टीमने केली आहे. एकात्मिक बांधकामाच्या तत्त्वज्ञानावर आधारित, हे जहाज निर्धारित वेळेत बांधून नौदलाकडे सुपूर्द केले गेले आहे.

P17A जहाजे P17 (शिवालिक) वर्गाच्या तुलनेत प्रगत शस्त्रास्त्रे आणि सेन्सर प्रणालीने सुसज्ज आहेत. या जहाजांमध्ये कम्बाइंड डिझेल किंवा गॅस (CODOG) प्रोपल्शन प्रणाली बसवण्यात आली आहे. या प्रणालीत डिझेल इंजिन आणि प्रत्येक शाफ्टवर कंट्रोलेबल पिच प्रोपेलर (CPP) चालवणारे गॅस टर्बाइन आणि अत्याधुनिक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम (IPMS) यांचा समावेश आहे. शक्तिशाली शस्त्रास्त्र आणि सेन्सर्स संचामध्ये ब्रह्मोस SSM, MFSTAR आणि MRSAM प्रणाली, 76मीमी SRGM, 30मीमी आणि 12.7मीमी क्लोज-इन वेपन सिस्टीमचा समावेश आहे. याशिवाय पाणबुडीविरोधी युद्धासाठी रॉकेटस् आणि टॉर्पेडोदेखील जहाजावर बसवण्यात आले आहेत.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content