Homeडेली पल्सनिलगिरी श्रेणीतले ‘तारागिरी’...

निलगिरी श्रेणीतले ‘तारागिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात

माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडद्वारे बांधलेले निलगिरी श्रेणीतले (प्रकल्प 17अ)मधले चौथे जहाज ‘तारागिरी’ मुंबईत माझगाव डॉक येथे झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय नौदलाकडे समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आले. युद्धनौकेच्या डिझाइन आणि बांधकामातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने झालेले हे आणखी एक मोठे पाऊल आहे. प्रकल्प 17अ फ्रिगेट्स ही बहुमुखी मोहिमांसाठी तयार केलेली जहाजे असून सागरी क्षेत्रातल्या सध्याच्या आणि भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे.

तारागिरी, हे पूर्वीच्या आयएनएस तारागिरीचे नवे रूप आहे. ते एक लिएंडर-क्लास फ्रिगेट होते जे 16 मे 1980 ते 27 जून 2013 या कार्यकाळात भारतीय नौदलाच्या ताफ्याचा भाग होते. तब्बल 33 वर्षे त्याने देशासाठी गौरवशाली सेवा दिली. नव्या पिढीचे हे अत्याधुनिक जहाज नौदल डिझाइन, स्टेल्थ, अग्निशक्ती, स्वयंचलन आणि टिकाऊपणाच्या क्षमतेतील एक मोठी झेप मानली जाते. वॉरशिप डिझाइन ब्युरो यांनी याचे डिझाइन केले असून युद्धनौकेची देखरेख मुंबईच्या टीमने केली आहे. एकात्मिक बांधकामाच्या तत्त्वज्ञानावर आधारित, हे जहाज निर्धारित वेळेत बांधून नौदलाकडे सुपूर्द केले गेले आहे.

P17A जहाजे P17 (शिवालिक) वर्गाच्या तुलनेत प्रगत शस्त्रास्त्रे आणि सेन्सर प्रणालीने सुसज्ज आहेत. या जहाजांमध्ये कम्बाइंड डिझेल किंवा गॅस (CODOG) प्रोपल्शन प्रणाली बसवण्यात आली आहे. या प्रणालीत डिझेल इंजिन आणि प्रत्येक शाफ्टवर कंट्रोलेबल पिच प्रोपेलर (CPP) चालवणारे गॅस टर्बाइन आणि अत्याधुनिक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम (IPMS) यांचा समावेश आहे. शक्तिशाली शस्त्रास्त्र आणि सेन्सर्स संचामध्ये ब्रह्मोस SSM, MFSTAR आणि MRSAM प्रणाली, 76मीमी SRGM, 30मीमी आणि 12.7मीमी क्लोज-इन वेपन सिस्टीमचा समावेश आहे. याशिवाय पाणबुडीविरोधी युद्धासाठी रॉकेटस् आणि टॉर्पेडोदेखील जहाजावर बसवण्यात आले आहेत.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content