Homeब्लॅक अँड व्हाईटराष्ट्रीय महामार्गांवर वापरली...

राष्ट्रीय महामार्गांवर वापरली जाणार प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली!

रस्ते सुरक्षा सुधारणे आणि अपघात घटनांना प्रतिसाद देण्याचा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, NHAI ने आपले सुधारित धोरण जारी केले आहे. याद्वारे सुधारित आणि भविष्यवेधी प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (एटीएमएस) मानके आणि तपशील 2023 ची अंमलबजावणी केली जाईल.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील नवीनतम शोधांचा उपयोग करून, राष्ट्रीय महामार्ग आणि द्रूतगती मार्गांवर रस्ते सुरक्षा आणि डिजिटल अंमलबजावणीत हा उपक्रम सुधारणा करेल.

वाहतूक नियमांच्या डिजिटल अंमलबजावणीवर जोर दिला जाणार आहे. त्या अंतर्गत आधीच्या व्हीआयडीएस कॅमेऱ्यांच्या जागी नव्याने आलेली व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्शन अँड एन्फोर्समेंट सिस्टम (व्हिआयडीईएस) स्वीकारली जाईल. दुचाकीवरुन तिघांनी प्रवास करणे, हेल्मेट आणि सीटबेल्टचे उल्लंघन, चुकीच्या मार्गिका किंवा दिशेने वाहन चालवणे, महामार्गावरील प्राण्यांचा वावर आणि पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडणे यासह 14 वेगवेगळ्या घटना ओळखण्याची व्हिआयडीईएसची क्षमता आहे.

आढळलेल्या घटनेच्या आधारावर, मार्गावरील गस्ती वाहनांना किंवा रुग्णवाहिकांना व्हिआयडीईएस सतर्क करेल, ई-चलान तयार करेल, जवळपासच्या व्हेरिएबल मेसेजिंग बोर्डांना संबंधित संदेश पाठवेल किंवा जवळच्या प्रवाशांना ‘राजमार्गयात्रा’ मोबाइल अॅपद्वारे सूचना पाठवेल.

सर्वसमावेशक चित्रिकरण व्याप्तीसाठी, हे कॅमेरे राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 10 किमी अंतरावर स्थापित केले जातील, प्रत्येक 100 किमीवर विविध कॅमेरा चित्रिकरण एकत्रित करणारी अत्याधुनिक सूचना आणि नियंत्रण कक्ष आहेत.

याशिवाय वाहतूक देखरेख ट्रॅफिक कॅमेरा प्रणालीही अद्ययावत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 1 किमीवर ती बसवली जाईल.

प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणीसाठी माहिती प्रदान करून आपत्ती व्यवस्थापनात, एटीएमएस सक्रिय भूमिका बजावू शकतात. महामार्गाच्या स्थितीचे ऑनलाइन सामायिकरण आणि इतर महत्वाची माहिती देखील हे प्रदान करतील, त्यामुळे संस्था आणि महामार्ग वापरकर्त्यांना मदत होईल.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content