Homeचिट चॅटवर्ध्यात राष्ट्रीय युवा...

वर्ध्यात राष्ट्रीय युवा दिवस व सडक सुरक्षा सप्ताह संप्पन्न!

नेहरू युवा केंद्र वर्धा (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) द्वारा वर्ध्याच्या इंद्रप्रस्थ न्यू आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे काल राष्ट्रीय युवा दिवस व राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला. खासदार रामदास तडस, आमदार डॉ. रामदास आंबटकर, विवेक देशमुख, डॉ. अभिजित वेरुळकर, डॉ. ए. व्ही. ससनकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

युवा

नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रामदास तडस यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रवर प्रकाश टाकून त्यांच्याबद्दल युवकांना प्रेरित केले. तसेच रामदास आंबटकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या नियमावर चालून युवकांनी त्यांची ध्येय प्राप्त होईपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका असे युवकांना संबोधित केले.

वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांच्याकडून चंदु खोंडे व रियाज खान यांनी राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह बद्दल माहिती देऊन वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे सांगितले.

जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा विजेता वेदांत रोकडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भाषण दिले. सर्व मान्यवरांनी नाशिक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणाचे थेट प्रक्षेपण बघितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन न्यू आर्ट कॉलेजचे प्राध्यापक पेठारे यांनी मानले.

नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक रोशन सयाम, आकाश मेलेकर, आकाश चौधरी यांनी My Bharat पोर्टल वर युवकांची नोंदणी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश इंगोले, शुभम ताकसांडे, अमोल चावरे, दिक्षांत टेंभरे यांनी परिश्रम घेतले.

Continue reading

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...
Skip to content