Homeटॉप स्टोरीशरद पवारांबरोबरच्या चर्चेला...

शरद पवारांबरोबरच्या चर्चेला नाना पटोलेंची दांडी!

राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या कुरबुरी मिटविण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आजही अपुरे पडले. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. परंतु, या बैठकीला दोन्ही पक्षातल्या नव्या वादाला तोंड फोडणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच दांडी मारली. दरम्यान, राज्य सरकारकडून आपल्यावर पाळत ठेवत असल्याच्या पटोले यांच्या आरोपाला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पक्षाच्या टिळक भवन येथील पक्षाच्या मुख्यालयात पक्षाच्या विविध नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरही बरीच चर्चा झाल्याचे कळते. दोन दिवसांपूर्वी लोणावळ्याच्या एका पक्ष कार्यकर्त्यांच्या शिबिरात पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला होता. त्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीतला पेच वाढला होता.

पटोले यांच्या आरोपाबद्दल शरद पवार यांना विचारले असता त्यांनी लहान माणसांच्या वक्तव्यावर आपण भाष्य करत नाही, असे सांगत पटोले यांना उडवून लावले. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करताना प्रत्येक सरकार आपल्याला असलेले धोके जाणून घेण्यासाठी यंत्रणा निर्माण करते, असे सांगत पटोले यांच्या आरोपाला अप्रत्यक्ष दुजोराच दिला होता.

आज पाटील यांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा झाल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी पटोले यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे नमूद केले. पटोले यांना केंद्र सरकार आपल्यावर पालत ठेवत असल्याचे सांगायचे होते. परंतु त्यांनी केंद्र असा शब्द वापरला नसल्याने सर्वांनी असा अर्थ काढला, असे पाटील म्हणाले.

आज संध्याकाळी पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंळाने शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक, या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे मंत्रीही यात सहभागी होते. मात्र, पटोले त्यांच्याबरोबर गेले नाहीत. या नेत्यांनी जवळजवळ पाऊण तास पवार यांच्याबरोबर चर्चा केली.

चर्चेनंतर थोरात यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी भाष्य केले. सध्याची राजकीय स्थिती, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, केंद्र सरकारने स्थापन केलेले सहकार मंत्रालय, अशा विविध विषयांवर आम्ही चर्चा केली. महाविकास आघाडीत कोणत्याही कुरबुरी नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content