Homeचिट चॅटमुंबई विद्यापीठाची येत्या...

मुंबई विद्यापीठाची येत्या शनिवार-रविवारी कार्यशाळा

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या विद्यमाने  येत्या शनिवारी, ३ ऑगस्ट आणि  रविवारी, ४ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात संस्थेच्या प्रेक्षागारात दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेची गोडी असणाऱ्या आणि भाषेच्या क्षेत्रात व्यावसायिक संधी शोधणाऱ्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त अशा ‘प्रमाण मराठी लेखन’ आणि ‘आवाज’ या दोन विषयांवर या कार्यशाळा अत्यल्प शुल्कात उपलब्ध होणार आहेत.

या क्षेत्रातील तज्ज्ञ वैभव चाळके (ज्येष्ठ पत्रकार) आणि उमेश घळसासी (नाट्य-चित्रपट-पत्रकारिता व्याख्याता) हे मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा  पूर्ण झाल्यानंतर सहभागींना,  गरवारे संस्थेकडून इ-प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक कार्यशाळेसाठी शुल्क ५००/- रुपये असेल तर दोन्ही कार्यशाळांसाठी नोंदणी करणाऱ्यांना सवलतीच्या दरात म्हणजे ७५०/- रुपये शुल्क देऊन दोन्ही कार्यशाळांमध्ये भाग घेता येईल.

नावनोंदणीसाठी संस्थेच्या https://www.gicededu.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी 9987395457 किंवा 85915 90174 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या समन्वयक नम्रता कडू यांनी केले आहे.

Continue reading

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...
Skip to content