Homeचिट चॅटमुंबई विद्यापीठाची येत्या...

मुंबई विद्यापीठाची येत्या शनिवार-रविवारी कार्यशाळा

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या विद्यमाने  येत्या शनिवारी, ३ ऑगस्ट आणि  रविवारी, ४ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात संस्थेच्या प्रेक्षागारात दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेची गोडी असणाऱ्या आणि भाषेच्या क्षेत्रात व्यावसायिक संधी शोधणाऱ्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त अशा ‘प्रमाण मराठी लेखन’ आणि ‘आवाज’ या दोन विषयांवर या कार्यशाळा अत्यल्प शुल्कात उपलब्ध होणार आहेत.

या क्षेत्रातील तज्ज्ञ वैभव चाळके (ज्येष्ठ पत्रकार) आणि उमेश घळसासी (नाट्य-चित्रपट-पत्रकारिता व्याख्याता) हे मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा  पूर्ण झाल्यानंतर सहभागींना,  गरवारे संस्थेकडून इ-प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक कार्यशाळेसाठी शुल्क ५००/- रुपये असेल तर दोन्ही कार्यशाळांसाठी नोंदणी करणाऱ्यांना सवलतीच्या दरात म्हणजे ७५०/- रुपये शुल्क देऊन दोन्ही कार्यशाळांमध्ये भाग घेता येईल.

नावनोंदणीसाठी संस्थेच्या https://www.gicededu.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी 9987395457 किंवा 85915 90174 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या समन्वयक नम्रता कडू यांनी केले आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content