Homeचिट चॅटमुंबई विद्यापीठाची येत्या...

मुंबई विद्यापीठाची येत्या शनिवार-रविवारी कार्यशाळा

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या विद्यमाने  येत्या शनिवारी, ३ ऑगस्ट आणि  रविवारी, ४ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात संस्थेच्या प्रेक्षागारात दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेची गोडी असणाऱ्या आणि भाषेच्या क्षेत्रात व्यावसायिक संधी शोधणाऱ्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त अशा ‘प्रमाण मराठी लेखन’ आणि ‘आवाज’ या दोन विषयांवर या कार्यशाळा अत्यल्प शुल्कात उपलब्ध होणार आहेत.

या क्षेत्रातील तज्ज्ञ वैभव चाळके (ज्येष्ठ पत्रकार) आणि उमेश घळसासी (नाट्य-चित्रपट-पत्रकारिता व्याख्याता) हे मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा  पूर्ण झाल्यानंतर सहभागींना,  गरवारे संस्थेकडून इ-प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक कार्यशाळेसाठी शुल्क ५००/- रुपये असेल तर दोन्ही कार्यशाळांसाठी नोंदणी करणाऱ्यांना सवलतीच्या दरात म्हणजे ७५०/- रुपये शुल्क देऊन दोन्ही कार्यशाळांमध्ये भाग घेता येईल.

नावनोंदणीसाठी संस्थेच्या https://www.gicededu.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी 9987395457 किंवा 85915 90174 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या समन्वयक नम्रता कडू यांनी केले आहे.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content