Homeकल्चर +१४ नोव्हेंबरपासून मुंबईत...

१४ नोव्हेंबरपासून मुंबईत वार्षिक संगीत महोत्सवाची मेजवानी

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात एक संगीत महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी हा महोत्सव १४, १५ आणि १६ नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.

महोत्सवाचा प्रारंभ १४ नोव्हेंबरला सुप्रसिद्ध सरोदवादक पं. तेजेंद्र नारायण मजुमदार यांच्या सरोदवादनाने होईल. त्यांना तबल्याची साथ पं. योगेश सम्सी यांची आहे. १५ नोव्हेंबरला जयपूर घराण्याचे नामवंत गायक पं. रघुनंदन पणशीकर यांचे गायन होईल. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि हार्मोनियमवर अमेय बिचू साथ करतील. १६ नोव्हेंबर रोजी संगीत महोत्सवाचा समारोप सुविख्यात गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल. त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवलकर आणि हार्मोनियमवर अनंत जोशी साथ देतील.

हे सर्व कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले  वातानुकूलीत सभागृहात रोज संध्याकाळी पाच वाजता सुरू होतील. हा संगीत महोत्सव विनाशुल्क असून गानरसिकांना आसनमर्यादेमुळे प्रथम येणाऱ्या प्राधान्य यानुसार प्रवेश मिळेल. तरी रसिकांनी या मैफलींचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content