Homeबॅक पेजमुंबई-सिंधुदूर्ग होणार एक्स्प्रेस...

मुंबई-सिंधुदूर्ग होणार एक्स्प्रेस वे होणार!

पर्यटन प्रकल्पाची एकही संधी सोडणार नसून समृद्धीप्रमाणेच मुंबई-सिंधुदूर्ग एक्स्प्रेस वे होणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

आज सिंधुदुर्गामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’चा मोठा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांतर्गत आखण्यात आलेल्या अनेक योजनांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा आज सावंतवाडी येथे पार पडला. या सोहळ्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार भरत गोगावले अशी मंडळी उपस्थित होती. यादरम्यान केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी कोकण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा आढावा घेतला.

काल नारायण राणेंसोबत मुख्यमंत्र्यांची सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांसंदर्भात तीन तास बैठक झाली. या उद्योग विभागांसाठी नारायण राणेंच्या एवढ्या योजना मी पाहिल्या की खर्‍या अर्थाने त्या घेण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही. केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या अनेक योजना नारायण राणेंकडे आहेत. महिला व तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी आखलेल्या अनेक योजनांची माहिती कालच्या बैठकीत नारायण राणेंनी दिली. एखादी वस्तू तयार झाल्यानंतर त्याचं मार्केटिंग, ब्रॅण्डिंग होणं गरजेचं आहे. त्या वस्तूला बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे याबाबतदेखील राणे साहेबांसोबत चर्चा झाली. यासाठीचे सर्व प्रयत्न राज्य व केंद्र सरकारकडून केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.

सावंतवाडीमध्ये आर्थिक विकासाला चालना देणारं शॉपिंग सेंटर विकसित करणं, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांच्या नावाचं ड्रेसिंग सेंटर उभारणं या कामांचं भूमीपूजन केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पर्यटन व्यवसायाला चालना देणारी ठिकाणं उभारणं हे राज्य सरकारचं कर्तव्यच आहे. अंबोली हिल स्टेशल उभारण्यासाठी राज्य सरकार योग्य ती मदत करेल. तसेच सिंधुरत्नच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव यांचं नाव देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Continue reading

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...
Skip to content