Homeकल्चर +मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने...

मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने आयोजित केले मान्सून विचारमंथन!

मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने कुलाबा, मुंबई येथील अगस्त्य सभागृह, आयएनएचएस अश्विनी येथे नुकतेच दुसरे मान्सून विचारमंथन व्याख्यान आयोजित केले.

कमोडोर (डॉ) श्रीकांत केसनूर, व्हीएसएम हे निवृत्त नौदल अधिकारी यात प्रमुख अतिथी वक्ते होते. आपल्या 36 वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी अनेक कमांडिंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींमध्ये काम केले आहे आणि सागरी संचालन, प्रशिक्षण, नेतृत्व, मुत्सद्दीपणा आणि प्रशासनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे. ‘लीडरशिप लेसन्स ऑफ इंडियन नेव्हल आयकॉन्स: ॲडम आर एल परेरा अँड आदर ल्युमिनरीज’ या व्याख्यानात, कमोडोर केसनूर यांनी सामरिक, संचालनात्मक आणि धोरणात्मक पातळीवर नेतृत्वाचे महत्त्व सांगितले. ज्यामुळे भारतीय नौदलाच्या उभारणीत आणि यशस्वी नौदलाला आकार देण्यावर तसेच विविध संचालनात्मक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्याचा फायदा झाला.

माजी नौदल प्रमुख दिवंगत ॲडम आर एल परेरा तसेच इतर दिग्गजांचे उदाहरण देऊन, त्यांनी आपल्या देशाच्या सागरी वारशावर त्यांचे असाधारण योगदान आणि त्यांचा चिरस्थायी प्रभाव अधोरेखित करत त्यांच्या जीवन प्रवासाचा तपशीलवार आलेख मांडला. प्रमुख पाहुणे, व्हाइस ॲडमिरल राजाराम स्वामीनाथन अतिविशिष्ट सेवा पदक, नौदल पदक प्राप्त नौदल प्रकल्प महासंचालक (मुंबई) यांच्या हस्ते अतिथी वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. नौदल कर्मचारी, इतिहासकार, विद्यार्थी आणि सागरी प्रेमींचा समावेश असलेला वैविध्यपूर्ण प्रेक्षकवर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता. हा संवाद अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरक आणि नेतृत्व आणि नौदल मूल्य प्रणालीमध्ये मौल्यवान माहिती प्रदान करणारा होता.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content