Homeबॅक पेजघोष ट्रॉफी क्रिकेटमध्ये...

घोष ट्रॉफी क्रिकेटमध्ये एमआयजी आणि डॅशिंग अंतिम फेरीत

एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे) या संघाने साईनाथ स्पोर्ट्स क्लबची घोडदौड संपुष्टात आणत चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यांना हे यश मिळवून देण्यात सलामी फलंदाज महेक मिस्त्रीची आक्रमक फलंदाजी कारणीभूत ठरली. तिने ५९ चेंडूत १० चौकार मारत नाबाद ७४ धावा फटकावल्या. त्यामुळे तिच्या संघाला साईनाथची ४ बाद १२६ ही तशी माफक धावसंख्या १९ षटकांमध्ये पार करता आली. त्यांची गाठ आता डॅशिंग स्पोर्ट्सशी उद्या बुधवारी माटुंगा जिमखान्यावर होईल.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने स्पोर्टिंग युनियनने कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेमसह आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये नॅशनल क्रिकेट क्लबचा ८ विकेट्सनी पराभव करून डॅशिंग स्पोर्ट्सने एमआयजीशी लढण्यासाठी आपली सिद्धता केली. नॅशनलला २० षटकांत केवळ ९ बाद ८६ अशी मजल मारता आली. त्यांची ध्रुवी त्रिवेदी ही १८ धावांची सर्वोच्च खेळी करू शकली. निलाक्षी तलाठी आणि श्रेया सुरेश यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. डॅशिंगने १५ षटकांमध्ये आपले लक्ष्य पार केले. २ बाद १८ नंतर खुशी निजाई (नाबाद २७) आणि किमया राणेने (नाबाद ३२) ६९ धावांची अभेद्य भागिदारी केली.

आजच्या पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये साईनाथने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तो तसा चुकीचा ठरला. सलामीची अंशू पाल आणि या स्पर्धेत एका शतकासह दोन अर्धशतके फटकावणारी किंजल कुमारी केवळ ४ धावांवर बाद झाल्याने त्यांची २ बाद ८ अशी अवस्था झाली. त्यानंतर शेजल विश्वकर्मा (५७ चेंडूत ५७ आणि वेदिका पाटील ५३ चेंडूत ५२) यांनी ११५ धावांची भागीदारी केली खरी, पण त्यामुळे एमआयजीसमोर फार मोठे लक्ष्य साईनाथला ठेवता आले नाही. महेक मिस्त्रीने आपल्या ऑफ स्पिनवर ४ षटके टाकत स्वत:ची उपयुक्ततापण सिद्ध केली.

संक्षिप्त धावफलक

साईनाथ स्पोर्ट्स क्लब-  २० षटकांमध्ये ४ बाद १२६ (सेजल विश्वकर्मा ५७, वेदिका राजेश पाटील ५२)

पराभूत वि.

एमआयजी क्रिकेट क्लब- १९ षटकात ४ बाद १२७ (महेक मिस्त्री नाबाद ७४)

सर्वोत्तम खेळाडू- महेक मिस्त्री

नॅशनल क्रिकेट क्लब- २० षटकांमध्ये ९ बाद ८६ (ध्रुवी त्रिवेदी १८, पूर्ती नाईक २८/२, निलाक्षी तलाठी १०/२, श्रेया सुरेश ८/२, तिशा नाईक २५/२)

पराभूत वि.

डॅशिंग स्पोर्ट्स- १५ षटकांत २ बाद ८७ (किमया राणे ३२ नाबाद, खुशी निजाई २७ नाबाद, तनिषा शर्मा १०/२)

सर्वोत्तम खेळाडू- निलाक्षी तलाठी

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content