Homeएनसर्कलमाहिती तंत्रज्ञानातल्या सहकार्यावर...

माहिती तंत्रज्ञानातल्या सहकार्यावर भारत आणि ओमानमध्ये सामंजस्य करार

भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि ओमानचे परिवहन, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, 15 डिसेंबर 2023 रोजी स्वाक्षरी झालेल्या या सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात परस्पर सहाय्य, तंत्रज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण आणि गुंतवणूक याद्वारे दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक सहकार्याला प्रोत्साहन देणे, हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. सामंजस्य करार दोन्ही देशांच्या स्वाक्षरीच्या तारखेपासून, 3 वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात G2G आणि B2B असे दोन्ही प्रकारचे द्विपक्षीय सहकार्य वाढेल. सामंजस्य कराराद्वारे दोन्ही देशांमधील सहकार्य वाढण्याची अपेक्षा असून, त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

पार्श्वभूमी:

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सहकार्याच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक चौकटी अंतर्गत माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या (आयसीटी) उदयोन्मुख आणि आघाडीच्या क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्याचे निश्चित केले आहे. आयसीटी क्षेत्रात द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय अनेक देश आणि बहुपक्षीय संस्थांबरोबर सहयोग करत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आयसीटी क्षेत्रात सहकार्य आणि माहितीची देवाणघेवाण वाढवण्यासाठी विविध देशांमधील त्याच्या समकक्ष संघटना/संस्थांबरोबर  सामंजस्य करार/करार केले आहेत. देशाला डिजिटली सक्षम समाज आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तित करण्यासाठी, भारत सरकारने हाती घेतलेल्या, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, ई. यासारख्या विविध उपक्रमांशी हे सुसंगत आहे. या बदलत्या परिप्रेक्षात, परस्पर सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने व्यवसायाच्या संधी शोधणे, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि डिजिटल क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे, ही काळाची गरज आहे.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content