Homeन्यूज अँड व्ह्यूजकर्बी आंगलाँगला ग्रासलेल्या...

कर्बी आंगलाँगला ग्रासलेल्या कट्टरतावाद्यांचा संघर्ष म्हणजे ‘मीरबीन’!

दिग्दर्शक मृदुल गुप्ता, लेखक मणिमाला दास आणि कर्बी फीचर फिल्म मीरबीनचे निर्माते धनीराम टिसो यांनी काल गोव्यात 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने माध्यमांशी काहीही आडपडदा न ठेवता संवाद साधला. कर्बी आंगलाँगला ग्रासलेल्या कट्टरतावाद्यांच्या संघर्षाचे, मीरबीन हा चित्रपट म्हणजे अस्सल चित्रण आहे. आमचा हा चित्रपट सत्य आणि वस्तुस्थितीची कथा आहे, असे दिग्दर्शक मृदुल गुप्ता यांनी सांगितले.

लोक आपल्या मुळांवर आघात होत असूनही संकटाशी टक्कर देणाऱ्या लवचिकतेचे प्रदर्शन करत पुन्हा उठून उभे राहत आहेत हे प्रसंग जिवंत करण्यासाठी, संपूर्ण चित्रपटात अनेक दृश्यांमध्ये झाडाची मुळे कथेला एक मजबूत प्रतीकात्मक कमान देत वापरली आहे, असे चित्रपटात वापरलेल्या मुळांच्या प्रतिकाबद्दल बोलताना लेखिका मणिमाला दास यांनी सांगितले.  

मणिमाला दास पुढे म्हणाल्या की, चित्रपटातील संगीत खऱ्या अर्थाने केवळ पारंपरिक कार्बी धून वापरून केलेले अस्सल संगीत आहे. आम्हाला आशा आहे की प्रेक्षक आमच्या चित्रपटाद्वारे कार्बींबद्दल सहानुभूती दाखवतील आणि कार्बीचा संघर्ष अनुभवतील, असे लेखिका मणिमाला यांनी सांगितले.

मणिमाला दास यांनी चित्रपटातील हातमागाच्या महत्वाबद्दल सांगितले. आसाममधील संघर्षात अडकलेल्या लोकांसाठी वस्त्रोद्योग हा पुनर्प्राप्तीचा आणि मुक्तीचा मार्ग ठरला. मीरबीन सुद्धा तिच्या बालपणीच्या सर्दीहुन, या कर्बी आदिवासी रिवाजातील, वस्त्रांच्या मायावी देवीच्या कथांमधून प्रेरणा घेते. नव्या आशा आणि उद्दिष्टांसह ती संकटातून यशस्वीपणे बाहेर पडते. 

या चित्रपटाच्या निवडीबद्दल बोलताना निर्माते धनोराम टिसो म्हणाले, चित्रपट निर्माता म्हणून जनजागृती करणे, लोक संकटातून कसे सावरले आणि अंध:कारमय भूतकाळाच्या छायेतून बाहेर पडून कसे नव्याने बहरले याची कथा सांगणे हे माझे कर्तव्य आहे.

वेगवान आणि चैतन्यपूर्ण आसामी चित्रपटाचे प्रतिनिधित्व करणारा मीरबीन, ईफ्फी 54 मध्ये प्रतिष्ठेच्या गोल्डन पीकॉक (सुवर्ण मयूर) पुरस्कारासाठी स्पर्धेत असलेल्या 15 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांपैकी एक आहे आणि महोत्सवात भारतीय चित्रपट विभागात तो दाखवण्यात आला. 

मीरबीन ही आशा आणि परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या प्रवृत्तीची आकर्षक कथा आहे. ही कथा, तिची मध्यवर्ती नायिका मीरबीन अथक संकटांना तोंड देत आपल्या स्वप्नांना कशी घट्ट धरुन ठेवते याबाबतचा जीवनप्रवास उलगडते. तिच्या संघर्षात, ती कार्बी लोकांच्या वेदना आणि त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे मूर्तीमंत प्रतिक बनते. 

Continue reading

जनआरोग्य योजनेत आता होणार २३९९ उपचार

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या आता १,३५६वरून २,३९९पर्यंत वाढविण्यात येणार आहे. एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या...

राज्यपाल देवव्रत यांच्या शपथविधीलाही अजितदादांची दांडी!

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ...

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...
Skip to content