Homeएनसर्कलआजपासून महाकुंभ! पर्यटकांसाठी...

आजपासून महाकुंभ! पर्यटकांसाठी एक अनोखी संधी!!

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे आजपासून महाकुंभ 2025ला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली. हा केवळ आध्यात्मिक संमेलनांसाठीच नव्हे तर जागतिक पर्यटनासाठीही एक महत्त्वाचा कार्यक्रम बनविण्यासाठी केंद्र सरकारचे पर्यटन मंत्रालय सज्ज झाले आहे. हा कार्यक्रम साजरा करताना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने पर्यटन मंत्रालय अनेक उपक्रम राबवत आहे. महाकुंभ हे जगातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे  धार्मिक संमेलन असून ते भारतातील चारपैकी एका ठिकाणी दर 12 वर्षांनी आयोजित केले जाते. महाकुंभ-2025, हे पूर्ण कुंभ असून ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आज, 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी, या कालावधीत भरत आहे. जगभरातील लाखो भाविक, पर्यटक आणि यात्रेकरूंना आकर्षित करणारा हा महाउत्सव भारताचा सांस्कृतिक, आध्यात्मिक वारसा आणि पर्यटनक्षमता प्रदर्शित करण्याची एक अनोखी संधी आहे.

पर्यटन मंत्रालयाने महाकुंभ येथे 5000 चौरस फूटाचा अतुल्य भारत नावाचा पॅव्हेलियन उभारला आहे, ज्याद्वारे परदेशी पर्यटक, तज्ज्ञ, संशोधक, प्रवासी समुदायाला सुविधा मिळणार आहेत. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि कुंभमेळ्याचे महत्त्व अधोरेखित करत हा कुंभमेळा अभ्यागतांना समृद्ध करेल. या पॅव्हेलियनमध्ये देखो अपना देश, पीपल्स चॉईस पोलदेखील असेल, ज्याद्वारे इथे भेट देणाऱ्यांना भारतातील त्यांच्या आवडत्या पर्यटनस्थळांसाठी मतदानाद्वारे पसंती देता येईल.

महाकुंभला उपस्थित राहणारे विदेशी पर्यटक, अतिथींच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी, पर्यटन मंत्रालयाने एक समर्पित टोल-फ्री पर्यटक इन्फोलाइन (1800111363  किंवा 1363) उपलब्ध केली आहे. इंग्रजी आणि हिंदीव्यतिरिक्त ही टोल फ्री इन्फोलाइन आता दहा आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये तसेच तमिळ, तेलुगू, कानडी, बंगाली, आसामी आणि मराठीसह भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये कार्यरत आहे. लोकांनी या सोहळ्याचे अनुभव आणि क्षण इतरांना सामाईक करावे यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी #Mahakumbh2025 आणि #SpiritualPrayagraj हे विशेष हॅशटॅग वापरण्यात येत आहेत. समाजमाध्यमांवरील स्पर्धा, आयटीडीसी, उत्तर प्रदेश पर्यटन आणि इतर संस्थांबरोबर सहयोगी संदेश यामुळे सोहळ्याला प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षा आहे.

पर्यटन मंत्रालयानं, उत्तर प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळ, आयआरसीटीसी आणि आयटीडीसीसारख्या प्रमुख पर्यटन भागीदारांच्या सहकार्याने विविध प्रकारची पर्यटन पॅकेजेस आणि सुखसोयीयुक्त निवास पर्याय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आयडीसीने, प्रयागराज इथं टेंट सिटीमध्ये अत्याधुनिक सोयींसह 80 निवास सुविधा उभारल्या आहेत तर आयआरसीटीसीनं यात्रेकरू आणि पर्यटकांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांसह तंबू उभारले आहेत. या पॅकेजेसची माहिती डिजीटल माहितीपुस्तिकेत उपलब्ध आहे.

महाकुंभला येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं, भारतातल्या अनेक शहरांतून प्रयागराजचा हवाई संपर्क वाढवण्यासाठी अलायन्स एअरबरोबर भागीदारी केली आहे. त्यामुळे देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही सहज आणि सोयीस्करपणे कार्यक्रमस्थळी पोहोचता येईल. या दुर्मिळ संधीचा फायदा घेण्यासाठी, पर्यटन मंत्रालय महाकुंभाची भव्यता आणि आध्यात्मिक सार टिपण्यासाठी मोठ्या प्रमाणात छायाचित्रण आणि ध्वनिचित्रमुद्रण प्रकल्प हाती घेणार आहे. महाकुंभाची भव्यता दर्शवणारी आणि आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्थळ म्हणून प्रयागराजची पर्यटनक्षमता अधोरेखित करणारी छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय माध्यम मंचांवर मोठ्या प्रमाणात सामाईक केली जातील.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content