Saturday, March 29, 2025
Homeपब्लिक फिगरलोकसभा अध्यक्ष ओम...

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला लंडनमध्ये!

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला बिर्ला यांनी काल लंडनमध्ये ब्रिटनच्या संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष सर लिंडसे हॉयल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. भारत संविधान स्वीकारल्याची 75 वर्षे साजरी करत आहे. भारतीय राज्यघटनेने देशात परिवर्तनात्मक सामाजिक-आर्थिक बदल घडवून आणले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे होईपर्यंत म्हणजे 2047पर्यंत भारत एक विकसित देश बनलेला असेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आजवर मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे निवडणुका घेण्याची भारतीय निवडणूक आयोगाची उत्कृष्ट परंपरा राहिली असून भारत ही जवळपास एक अब्ज मतदार असलेली चैतन्यपूर्ण लोकशाही आहे. भारतातील निवडणूक प्रक्रियेत महिलांचा उत्साहवर्धक सहभाग असतो. अशा  सहभागातून आपल्या निवडणूक प्रक्रियेतील सर्वसमावेशकता दिसून येते. भारतातील लोकशाही तळागाळापासून संसदेपर्यंत खोलवर रुजलेली आहे. देश धोरणात्मक हस्तक्षेपांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था, राजकारण आणि समाजातील लिंगाधारित तफावत भरून काढत आहे, असे ते म्हणाले. संसदीय लोकशाही म्हणून भारताची कामगिरी अधोरेखित करताना बिर्ला यांनी आवर्जून नमूद केले की विविधता असूनही, संसदीय संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात भारत यशस्वी झाला आहे.

भारत आणि ब्रिटनमधील संसदीय सहकार्य मजबूत करण्याचे आवाहन करत बिर्ला यांनी दोन्ही देशांदरम्यान संसदीय ज्ञान, सर्वोत्तम पद्धती आणि अनुभवांची अधिकाधिक देवाणघेवाण करण्यावर भर दिला. दोन्ही देशांच्या युवा आणि महिला संसद सदस्यांनी वारंवार संवाद साधायला हवा, असे ते म्हणाले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष आणि अंतराळ या क्षेत्रांमध्ये भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय संबंध दृढ झाले आहेत. याचा दोन्ही देशांतील लोकांना फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि ब्रिटनमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांचा संदर्भ देत बिर्ला यांनी नमूद केले की दोन्ही देश अन्न आणि आरोग्य सुरक्षेच्या मानवतावादी समस्या सोडवण्यासाठी आणि हवामान बदलासारख्या वाढत्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

Continue reading

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा कुणाल कामराचा हव्यास!

पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायमूर्ती तसेच न्यायव्यवस्था याच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कुणाल कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांना लक्ष्य करत खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा...

कांदा होणार आणखी स्वस्त! निर्यातशुल्क हटवले!!

महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठेत या महिन्यापासून कांद्याची आवक वाढली आहे, ज्यामुळे किंमती घसरल्या आहेत. कांदा स्वस्त झाला आहे. 21 मार्च 2025 रोजी लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांद्याचा भाव अनुक्रमे 1330 आणि 1325 रुपये प्रति क्विंटल होता. कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी कांद्याचे रब्बी उत्पादन 227 लाख मेट्रिक...

सचिनभाऊ चषक शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या आमदार सचिनभाऊ अहिर चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलचा उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. निर्णायक बोर्डपर्यंत पिछाडीवर राहिलेल्या प्रसन्नने अचूक फटकेबाज खेळ करणाऱ्या...
Skip to content