Homeकल्चर +कोमसाप दादरची रंगली...

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग’ कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात झाला. कार्यक्रमात कोमसाप दादर शाखामधील ज्येष्ठ ते तरुण अशा कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतला व आपले स्वरचित काव्य सादर केले.

कार्यक्रमासाठी आमंत्रित अतिथी म्हणून विद्या प्रभू, कोमसाप मुंबई जिल्हाध्यक्ष व जगदीश भोवड, पत्रकार व कोमसाप मुंबई जिल्हा प्रतिनिधी तर प्रमुख अतिथी म्हणून कोमसाप दादर शाखाध्यक्ष अंजना कर्णिक उपस्थित होत्या. या कार्यक्रमास दिलीप गांगल, स्कॉप अध्यक्ष, चंद्रकांत कवळी, सचिव, सुरेंद्र पोतदार, समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यांनी अगदी मनसोक्त कविता आणि गीतांचा आस्वाद घेतला. अगदी आनंददायी वातावरणात सदर कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादर शाखा सचिव कवी मनोज धुरी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता दादर शाखेचे अध्यक्ष, कार्यवाह यांच्यासोबत सहकार्यवाह कवी समीर बने यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमात विद्या प्रभू, अंजना कर्णिक, डॉ. शिल्पा जोशी, कवी चंद्रकांत कवळी, मनोज धुरंधर, समीर बने, सुरेश कापडोसकर, निर्मला देऊसकर, सुप्रिया ठोकळ, युवा प्रतिनिधी वनश्री राडे व स्कॉपच्या काही सभासदांनी आपापल्या कविता, गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content