Homeकल्चर +कोमसाप दादरची रंगली...

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग’ कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात झाला. कार्यक्रमात कोमसाप दादर शाखामधील ज्येष्ठ ते तरुण अशा कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतला व आपले स्वरचित काव्य सादर केले.

कार्यक्रमासाठी आमंत्रित अतिथी म्हणून विद्या प्रभू, कोमसाप मुंबई जिल्हाध्यक्ष व जगदीश भोवड, पत्रकार व कोमसाप मुंबई जिल्हा प्रतिनिधी तर प्रमुख अतिथी म्हणून कोमसाप दादर शाखाध्यक्ष अंजना कर्णिक उपस्थित होत्या. या कार्यक्रमास दिलीप गांगल, स्कॉप अध्यक्ष, चंद्रकांत कवळी, सचिव, सुरेंद्र पोतदार, समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यांनी अगदी मनसोक्त कविता आणि गीतांचा आस्वाद घेतला. अगदी आनंददायी वातावरणात सदर कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादर शाखा सचिव कवी मनोज धुरी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता दादर शाखेचे अध्यक्ष, कार्यवाह यांच्यासोबत सहकार्यवाह कवी समीर बने यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमात विद्या प्रभू, अंजना कर्णिक, डॉ. शिल्पा जोशी, कवी चंद्रकांत कवळी, मनोज धुरंधर, समीर बने, सुरेश कापडोसकर, निर्मला देऊसकर, सुप्रिया ठोकळ, युवा प्रतिनिधी वनश्री राडे व स्कॉपच्या काही सभासदांनी आपापल्या कविता, गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content