Homeन्यूज ॲट अ ग्लांसकेजरीवालांचे राजकीय भवितव्य...

केजरीवालांचे राजकीय भवितव्य ८ फेब्रुवारीला निश्चित!

राजधानी दिल्लीत सध्या असलेले आम आदमी पार्टीचे सरकार (निशाणी- झाडू) कायम राहणार का, हे येत्या ८ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. येत्या ५ फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. काँग्रेस (निशाणी- हाताचा पंजा) तसेच भारतीय जनता पार्टी (निशाणी- कमळ) हे या राज्यातले प्रमुख पक्ष असून त्यांचेही भवितव्य यादिवशीच निश्चित होईल. अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा तसेच राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसमध्ये यावेळी मुकाबला होणार आहे.

केजरीवाल

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दुपारी एका पत्रकार परिषदेत दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी १० जानेवारीला अधिसूचना जारी केली जाईल. त्यादिवसापासून उमेदवार आपले उमेदवारीअर्ज दाखल करू शकतील. १७ जानेवारीपर्यंत उमेदवार आपले उमेदवारीअर्ज दाखल करू शकतील. १८ जानेवारीला उमेदवारीअर्जांची छाननी होईल. २० जानेवारीपर्यंत उमेदवारअर्ज मागे घेता येतील. ५ फेब्रुवारीला मतदान होईल आणि ८ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असे कुमार यांनी जाहीर केले.

केजरीवाल

दिल्लीत विधानसभेच्या ७० जागा असून सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. एकंदर एक कोटी ५५ लाख मतदार मतदानाचा अधिकार बजावू शकतील. त्यात ८३ लाख ८९ लाख पुरूष तर ७१ लाख ७४ हजार महिला मतदारांचा समावेश आहे. साधारण दोन लाक मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. ८५ वर्षांवरील मतदारांकरीता आयोगाने ऑनलाईन मतदानाची सोय उपलब्ध केली ाहे, असेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर केलेल्या आरोपांना धुडकावून लावत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएम हॅक होऊ शकत नसल्याचा दावाही यावेळी केला.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content