Homeन्यूज ॲट अ ग्लांसकेजरीवालांचे राजकीय भवितव्य...

केजरीवालांचे राजकीय भवितव्य ८ फेब्रुवारीला निश्चित!

राजधानी दिल्लीत सध्या असलेले आम आदमी पार्टीचे सरकार (निशाणी- झाडू) कायम राहणार का, हे येत्या ८ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. येत्या ५ फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. काँग्रेस (निशाणी- हाताचा पंजा) तसेच भारतीय जनता पार्टी (निशाणी- कमळ) हे या राज्यातले प्रमुख पक्ष असून त्यांचेही भवितव्य यादिवशीच निश्चित होईल. अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा तसेच राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसमध्ये यावेळी मुकाबला होणार आहे.

केजरीवाल

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दुपारी एका पत्रकार परिषदेत दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी १० जानेवारीला अधिसूचना जारी केली जाईल. त्यादिवसापासून उमेदवार आपले उमेदवारीअर्ज दाखल करू शकतील. १७ जानेवारीपर्यंत उमेदवार आपले उमेदवारीअर्ज दाखल करू शकतील. १८ जानेवारीला उमेदवारीअर्जांची छाननी होईल. २० जानेवारीपर्यंत उमेदवारअर्ज मागे घेता येतील. ५ फेब्रुवारीला मतदान होईल आणि ८ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असे कुमार यांनी जाहीर केले.

केजरीवाल

दिल्लीत विधानसभेच्या ७० जागा असून सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. एकंदर एक कोटी ५५ लाख मतदार मतदानाचा अधिकार बजावू शकतील. त्यात ८३ लाख ८९ लाख पुरूष तर ७१ लाख ७४ हजार महिला मतदारांचा समावेश आहे. साधारण दोन लाक मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. ८५ वर्षांवरील मतदारांकरीता आयोगाने ऑनलाईन मतदानाची सोय उपलब्ध केली ाहे, असेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर केलेल्या आरोपांना धुडकावून लावत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएम हॅक होऊ शकत नसल्याचा दावाही यावेळी केला.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content