Homeन्यूज ॲट अ ग्लांसकेजरीवालांचे राजकीय भवितव्य...

केजरीवालांचे राजकीय भवितव्य ८ फेब्रुवारीला निश्चित!

राजधानी दिल्लीत सध्या असलेले आम आदमी पार्टीचे सरकार (निशाणी- झाडू) कायम राहणार का, हे येत्या ८ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. येत्या ५ फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. काँग्रेस (निशाणी- हाताचा पंजा) तसेच भारतीय जनता पार्टी (निशाणी- कमळ) हे या राज्यातले प्रमुख पक्ष असून त्यांचेही भवितव्य यादिवशीच निश्चित होईल. अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा तसेच राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसमध्ये यावेळी मुकाबला होणार आहे.

केजरीवाल

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दुपारी एका पत्रकार परिषदेत दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी १० जानेवारीला अधिसूचना जारी केली जाईल. त्यादिवसापासून उमेदवार आपले उमेदवारीअर्ज दाखल करू शकतील. १७ जानेवारीपर्यंत उमेदवार आपले उमेदवारीअर्ज दाखल करू शकतील. १८ जानेवारीला उमेदवारीअर्जांची छाननी होईल. २० जानेवारीपर्यंत उमेदवारअर्ज मागे घेता येतील. ५ फेब्रुवारीला मतदान होईल आणि ८ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असे कुमार यांनी जाहीर केले.

केजरीवाल

दिल्लीत विधानसभेच्या ७० जागा असून सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. एकंदर एक कोटी ५५ लाख मतदार मतदानाचा अधिकार बजावू शकतील. त्यात ८३ लाख ८९ लाख पुरूष तर ७१ लाख ७४ हजार महिला मतदारांचा समावेश आहे. साधारण दोन लाक मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. ८५ वर्षांवरील मतदारांकरीता आयोगाने ऑनलाईन मतदानाची सोय उपलब्ध केली ाहे, असेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर केलेल्या आरोपांना धुडकावून लावत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएम हॅक होऊ शकत नसल्याचा दावाही यावेळी केला.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content