Homeन्यूज ॲट अ ग्लांसकेजरीवालांचे राजकीय भवितव्य...

केजरीवालांचे राजकीय भवितव्य ८ फेब्रुवारीला निश्चित!

राजधानी दिल्लीत सध्या असलेले आम आदमी पार्टीचे सरकार (निशाणी- झाडू) कायम राहणार का, हे येत्या ८ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. येत्या ५ फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. काँग्रेस (निशाणी- हाताचा पंजा) तसेच भारतीय जनता पार्टी (निशाणी- कमळ) हे या राज्यातले प्रमुख पक्ष असून त्यांचेही भवितव्य यादिवशीच निश्चित होईल. अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा तसेच राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसमध्ये यावेळी मुकाबला होणार आहे.

केजरीवाल

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दुपारी एका पत्रकार परिषदेत दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी १० जानेवारीला अधिसूचना जारी केली जाईल. त्यादिवसापासून उमेदवार आपले उमेदवारीअर्ज दाखल करू शकतील. १७ जानेवारीपर्यंत उमेदवार आपले उमेदवारीअर्ज दाखल करू शकतील. १८ जानेवारीला उमेदवारीअर्जांची छाननी होईल. २० जानेवारीपर्यंत उमेदवारअर्ज मागे घेता येतील. ५ फेब्रुवारीला मतदान होईल आणि ८ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असे कुमार यांनी जाहीर केले.

केजरीवाल

दिल्लीत विधानसभेच्या ७० जागा असून सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. एकंदर एक कोटी ५५ लाख मतदार मतदानाचा अधिकार बजावू शकतील. त्यात ८३ लाख ८९ लाख पुरूष तर ७१ लाख ७४ हजार महिला मतदारांचा समावेश आहे. साधारण दोन लाक मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. ८५ वर्षांवरील मतदारांकरीता आयोगाने ऑनलाईन मतदानाची सोय उपलब्ध केली ाहे, असेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर केलेल्या आरोपांना धुडकावून लावत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएम हॅक होऊ शकत नसल्याचा दावाही यावेळी केला.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content