Homeकल्चर +युवक-युवतींनो, जरा मोबाईल...

युवक-युवतींनो, जरा मोबाईल बाजूला ठेवा…

आजची तरुण पिढी मोबाईलमध्ये मश्गुल आहे, ही खेदाची बाब आहे. तरुणांनो, मोबाईल बाजूला ठेवून जमिनीवर या आणि देशाचा विचार करा, अशा शब्दांत राष्ट्रपती शौर्य चक्राने सन्मानित मेजर मधुसूदन सुर्वे यांनी मोबाईलमध्ये गुंतून पडलेल्या युवक-युवतींची कानउघाडणी केली.

मुंबईत बोरीवलीच्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना डॉ. सुचिता पाटील यांनी मेजर मधुसूदन सुर्वे यांच्या चित्तथरारक अनुभवसंपन्न मुलाखतीने गुंफले. यावेळी ऑपरेशन विजय कारगिल यासह विविध ठिकाणी असंख्य दहशतवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या मेजर सुर्वे यांनी आपले चित्तथरारक अनुभव सांगितले. दोन्ही पाय गमवावे लागलेल्या मेजर सुर्वे यांनी आपल्या चार पिढ्या भारतीय लष्करात होत्या असे सांगत आपले चिरंजीव मंदार यांच्या रुपाने पाचवी पिढीसुद्धा लवकरच भारतीय लष्करी सेवेत रुजू होणार असल्याचे अभिमानाने सांगितले.

डॉ. पाटील यांनी ध्वनीचित्रमुद्रित केलेली छोटी डॉक्युमेंटरीसुद्धा यावेळी ओंकार देशमुख यांनी सादर केली. लवकरच मेजर सुर्वे यांच्या लष्करी सेवेतील चित्तथरारक घटनांवर आधारित पूर्ण लांबीचा चित्रपट २६ जानेवारी २०२५पर्यंत प्रदर्शित होणार असून रणविर सिंह मेजर मधुसूदन सुर्वे यांची तर आलिया भट्ट त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती शौर्य चक्र प्रदान केल्यानंतर रात्रीच्या भोजनासाठी जेव्हा आमंत्रित केले तेव्हा आपली काय मनोभावना झाली हा प्रसंग मेजर सुर्वे यांनी कथन केला.

हे संपूर्ण प्रसंग ऐकताना मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिक श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. या कार्यक्रमात मेजर सुर्वे यांच्या हस्ते राकेश वायंगणकर यांना जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हाडाचे माजी सभापती विनोद घोसाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड, सुविद्या प्रसारक मंडळाचे माजी पदाधिकारी महादेव रानडे आदी मान्यवर उपस्थित होते. सचिन वगळ यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. नयना रेगे यांनी केले. विजय वैद्य यांनी व्याख्यानमालेचा आढावा घेतला.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content