Homeएनसर्कलअमृत मोहिमेअंतर्गत "जल दिवाळी"...

अमृत मोहिमेअंतर्गत “जल दिवाळी” अभियान संपन्न!

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) अमृत (अटल मिशन फॉर रिजुव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन,AMRUT) या मोहिमेअंतर्गत मंत्रालयाच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (दीनदयाळ अंत्योदय योजना,NULM), यांच्या सहकार्याने “स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया, या प्रगतीशील उपक्रम नुकताच ओदिशात संपन्न झाला.

जलप्रशासनात महिलांचा समावेश करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. यावेळी महिलांना त्या रहात असलेल्या शहरांमधील जल प्रक्रिया प्रकल्पांना (WTPs) भेटी देऊन जलशुद्धीकरण प्रक्रियेची प्राथमिक माहिती दिली गेली. नागरिकांना उत्तम दर्जाचे पाणी मिळेल याची खात्री देणाऱ्या  स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या महत्त्वाच्या प्रक्रियेची माहिती या भेटींमधून महिलांना दिली गेली. याव्यतिरिक्त, महिलांना पाणी गुणवत्ता चाचणीच्या प्रक्रियेची माहिती देखील मिळेल.पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत महिलांमध्ये स्वमालकी आणि  स्वत्वाची भावना निर्माण करणे हे या मोहिमेचे प्रमुख आणि व्यापक उद्दिष्ट आहे.

भारतात 65,000 MLD पेक्षा जास्त जल प्रक्रिया क्षमता असलेले रचनात्मक आणि 55,000 MLD पेक्षा जास्त कार्यक्षम असलेले 3,000 पेक्षा जास्त जलशुद्धीकरण प्रक्रिया क्षमता प्रकल्प आहेत. या मोहिमेदरम्यान, महिला बचत गट (SHGs) 20,000 MLD पेक्षा जास्त (देशातील एकूण 35% पेक्षा जास्त) क्षमता असलेल्या 550 हून अधिक जलशुद्धीकरण प्रकल्पांना भेट देतील.

घरातील पाणी व्यवस्थापनात महिलांचा महत्वपूर्ण वाटा असतो. महिलांना जलशुद्धीकरण प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांबद्दलचे ज्ञान देऊन त्यांचे सक्षमीकरण करून, घरांसाठी सुरक्षित आणि शुद्ध पाणी मिळवणे सुनिश्चित करण्यासाठी त्यांची क्षमता वाढवणे हे मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुरुषांचे पारंपारिक वर्चस्व असलेल्या सर्वच क्षेत्रांमध्ये समावेशकता आणि विविधतेला प्रोत्साहन देऊन लिंगभाव समानतेच्या समस्यांचे निराकरण करणे आहे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

“स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया “हे अभियान”, “जल दिवाळी” या उपक्रमांच्या पहिला टप्प्यात सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील (प्रारुप आचारसंहितेतील 5 राज्ये वगळता) 15,000 पेक्षा जास्त स्वमदत गटातील महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.

देशभरात मोहिमेने निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये या पुढील बाबी समाविष्ट आहेत:

1.महिलांना जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणी गुणवत्ता चाचणी या सुविधांच्या कामकाजाची ओळख करून देणे‌

2.महिला बचत गटांच्या कार्याच्या समावेषकतेला आणि सहभागाला पुरस्कार आणि लेखांद्वारे प्रोत्साहन देणे.

3.अमृत (AMRUT) योजना आणि त्याचा पाण्याच्या पायाभूत सुविधांवर होणारा परिणाम याविषयी महिलांना परिचित करून त्यांना शिक्षित करणे.

जलप्रक्रियेच्या, हक्कांची आणि जबाबदारीची जाणीव, सर्वसमावेशकतेला चालना, स्वयंसहाय्यता गटांचे सक्षमीकरण, सकारात्मक समुदाय प्रभाव आणि भविष्यातील उपक्रमांचे प्रारुप याविषयी जागरूकता आणि ज्ञान वाढवणे यांचा समावेश या मोहिमेच्या यशस्वीततेच्या अपेक्षित उद्दिष्टांमध्ये होतो.

अमृत आणि राष्ट्रीय नागरी उपजिविका विभागांतील राज्य आणि शहरांतील अधिकारी हे जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या या भेटींची व्यवस्था करतील. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने पाण्याच्या संदर्भातील मूलभूत सुविधांसाठी महत्त्वाच्या बाबींमध्ये महिलांचा समावेश करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असलेल्या या उपक्रमात सर्व राज्य आणि शहरातील अधिकार्‍यांना सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि समर्थन देण्याचे आवाहन मंत्रालयाने केले आहे. 

Continue reading

बिहारमधल्या निवडणूक निरीक्षकांची पहिली फेरी पूर्ण

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आयोगाने 121 सर्वसाधारण निरीक्षक आणि 18 पोलिस निरीक्षकांची नियुक्ती केली असून दुसऱ्या टप्प्यासाठी 122 सर्वसाधारण निरीक्षक आणि 20 पोलिस निरीक्षक नेमले आहेत. तसेच, यादरम्यान सुरू असलेल्या 8 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी 8 सर्वसाधारण आणि 8 पोलिस निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आपापल्या मतदारसंघांमधील नियुक्तीनंतर सर्व निरीक्षकांनी त्यांच्या पहिल्या भेटी पूर्ण...

तुतीकोरिन बंदरात 5 कोटींचे चिनी फटाके जप्त!

दीपावलीपूर्वी फटाक्यांची बेकायदेशीर आयात रोखण्याच्या प्रयत्नात करण्यात आलेल्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 'ऑपरेशन फायर ट्रेल' या मोहिमेत, तुतीकोरिन बंदरात चाळीस फुटाचे दोन कंटेनर पकडले. या कंटेनरमध्ये 83,520 चिनी फटाके असल्याचे आढळून आले. अभियांत्रिकी वस्तू म्हणून ते पाठवण्यात येत होते. जप्त करण्यात आलेल्या मालाची...

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...
Skip to content