Monday, April 14, 2025
Homeडेली पल्सलहान मुलांना मोबाईलपासून...

लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याची जबाबदारी पालकांचीच!

लहान मुलांकडे स्वतःचा मोबाईल नसला, तरी मुलांना गप्प बसवण्यासाठी पालक स्वतःचा मोबाईल मुलांना देतात. यामुळे मुलांना सोशल मीडियावर सहज प्रवेश मिळतो. मुलांना इंटरनेटमुळे जगभरातल्या ज्ञानाची कवाडे खुली झाली असली तरी लहान मुलांविरोधातील गुन्हेगारीही त्यामुळे वाढली आहे. त्यातूनच ऑनलाईन माध्यमातून होणारे मुलांचे लैंगिक शोषण वाढते. ते रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतेच केले.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेफ वेब फॉर चिल्ड्रन’ या कार्यक्रमाचे उद्घाटन तटकरे यांच्या हस्ते मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात करण्यात

आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, एकात्मिक बालविकास योजना आयुक्त कैलास पगारे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, चाइल्ड फंड इंडियाचे राजेश रंजन सिंग आदी उपस्थित होते.

सोशल मीडिया, इंटरनेटच्या वापरामुळे आपले आयुष्य जसजसं सोप होत आहे, तशीच आपली प्रायव्हसी त्यामुळे कमी होत आहे. हॅकर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन मार्गांनी फसवणूक करत आहेत.

सोशल मीडिया, इंटरनेट आणि नवे तंत्रज्ञान याचा सुरक्षितरित्या वापर करणे आवश्यक आहे. लहान मुलेही इंटरनेट वापरत असल्यामुळे त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचून सायबर क्राईमबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.

लहान मुले, महिला आणि पालक यांच्यात वेब सुरक्षा याविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुलांनी इंटरनेटचा सुरक्षितरित्या आणि योग्यप्रकारे वापर कसा करावा यासाठी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न आहे. सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण व गैरवर्तन यापासून संरक्षण करणे या उद्देशाने मुलांसाठी ऑनलाईन सुरक्षिततेचा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार असल्याचे सुशीबेन शाह यांनी यावेळी सांगितले.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

मध्य भारताला पावसाने झोडपले, बिहारमध्ये दोन दिवसांत ८२ बळी!

भारताच्या मध्य तसेच पूर्व भागाला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये ८२ जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. मुसळधार पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही जीवितहानी झाली आहे. बिहार सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी...

वक्फनंतरची आज पहिली जुम्मा नमाज! ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त!!

वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर आज पहिल्यांदाच मुसलमानांकडून पढली जाणारी पहिली जुम्माची नमाज असून एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातल्या अनेक भागात मुस्लीम मोहल्ल्याच्या परिसरात पोलीसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. वक्फ बोर्डाच्या कायद्यात झालेल्या सुधारणांना बहुतांशी सर्वच मुस्लीम संघटनांनी तसेच विरोधी...

तव्वहूर राणाचा बोलविता धनी कोण? १२ वाजता होणार चौकशी सुरू!

मुंबईत झालेल्या २६ / ११चा मास्टरमाईंड तव्वहूर राणा सध्या एनआयएच्या ताब्यात असून साधारण १२ वाजल्यापासून त्याच्या चौकशीला सुरूवात होईल. या चौकशीत राणाचा पाकिस्तानमधला बोलविता धनी कोण, त्याला पैसा पुरवणारा कोण तसेच त्याचे भारतातले जाळे शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाणार...
Skip to content