Homeमाय व्हॉईसबरे झाले! उद्धव...

बरे झाले! उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडले!!

एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत उठाव केल्यावर गेले सात-आठ महिने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर शक्तीप्रदर्शन केलेले नव्हते. शिवसेना भवनात ते येत होते. परंतु तेथे ते फक्त शिवसेना नेते आणि शिवसैनिकांना भेटत होते. बांद्रा येथील मातोश्रीच्या प्रांगणात त्यांनी शिवसैनिकांना संबोधितही केले होते. (तेव्हाची तेथील गर्दी काही शेकड्यांची होती. हीच माहिती काही मोजक्याच शिवसेना विरोधकांच्या दातात अडकून पडली होती.) मातोश्रीसमोर काय नेहमीच शिवसैनिक असतात. त्यात काय मोठे, असे कुजके बारही सोडले गेले होते. परंतु दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी बिर्ला मातुश्री सभागृहात स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमातील शिवसैनिकांच्या गर्दीने विरोधकांची तोंडे गप्प केली आहेत, असेच म्हणावे लागेल.

शिवसैनिक आणि स्थानीय लोकाधिकार संघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी नेटाने प्रयत्न करून हा मराठी भाषा दिन मोठ्या प्रमाणावर यशस्वी केला असेच म्हणावे लागेल. शिवसेना फुटीनंतरचा हा उद्धव यांचा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. आज मराठी भाषा दिन आणि आजपासूनच सुरू झालेल्या राज्य विधिमंडळ अधिवेशनाची सुरुवात मात्र राज्यपालांनी हिंदीतून केली, असा सणसणीत बोचाकारा काढत उद्धवरावांनी चौफेर टोलेबाजीस सुरुवात केली. मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम असल्याने राजकारणावर कमीच बोलेन, अशी सुरुवात करून मराठी मुलांच्या नोकऱ्यांसाठी स्थानीय लोकाधिकार महासंघाने केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केल्यानंतर मात्र त्यांच्या भाषणाची गाडी राजकारणावर आली आणि ती तशी येणे आवश्यकच होते, कारण राजकारण आले नसते तर विरोधकांच्या हातात आयते कोलितच मिळाले असते…

उद्धव

अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोगावर बोलणे झालेच. हा चुनाव आयोग नाही तर हा चुना लगाव आयोग असल्याची कठोर टीका करून आयोगाने आमच्यावर घोर अन्याय केला असल्याचा त्यांनी पाढाच वाचला. आमच्या पक्षाप्रमाणेच रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात फूट पडली. त्यांचाही वाद निवडणूक आयोगाकडे गेला. परंतु या प्रकरणात मात्र आयोगाने निवडणूक चिन्ह वा पक्षाचे नाव कोणत्याही एका गटास दिले नाही. जे चालू आहे तेच चालू देण्यात आले, कारण त्या दोन्ही गटाचा भारतीय जनता पक्षास पाठिंबा आहे. हे एकच नाही तर असे अनेक पक्षपात आहेत आणि ते आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणणार आहोतच. विरोधी गटाने आपले नाव चोरले तसेच धनुष्यबाणही चोरले पण ठाकरे हे नाव कसे चोरणार? असा खोचक सवालही त्यांनी केला.

समृद्धीवर मराठीचा दुःस्वास

याआधी बोलताना माजी उद्योग मंत्री व ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी समृद्धी महामार्गावरील नामफलकात मराठीचा दुःस्वास केला जात असून बाळासाहेबांच्या प्रेमाचा दिखावा करणाऱ्यांच्या राज्यात बाळासाहेबांचे नावही या महामार्गावर धड लिहिलेले नाही. इतकेच नव्हे तर त्याचे नावही मिंधे गट घेत नसल्याची तक्रार देसाई यांनी केली. या छोटेखानी समारंभात एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे उद्धवजींचे आतापर्यंतचे मौन आणि जेव्हा त्यांनी मौन सोडले तेव्हा “it is better to keep your mouth closed and let people think you are a fool that’s to open it and removed all doubts” या विधानाची पुरेपूर प्रचिती आली. “politics is opium for the masses of today” हा टॅग बदलून लावण्याची शक्ती या गर्दीत दिसली असे म्हटले तर वावगे ठरू नये….

Continue reading

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...
Skip to content