Homeएनसर्कलजाचक फी वसुलीचा...

जाचक फी वसुलीचा भार हलका होणार?

कोरोना संकटात बेरोजगारी आणि आर्थिक बाजू अस्थिर झाल्याने सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत शाळा, कॉलेज आभासी शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून शंभर टक्के शिक्षणशुल्क, फी वसुली करत आहेत. ही जाचक फी वसुली 50 टक्के कमी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष ऍड. अमोल मातेले यांच्या नेतृत्त्वाखाली लावून धरली आहे.

याप्रश्नी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत राज्य सरकारने शाळा, कॉलेज, अगदी केजी to पीजी स्तरावर शिक्षण शुल्क 50 टक्के कमी करावे, कोरोना संकटात पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. जयंत पाटील यांनी याप्रश्नी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून शाळा, कॉलेजचे शिक्षण शुल्क 50 टक्के कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.

याप्रश्नी तोडगा न निघाल्यास मंत्रालयासमोर सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे अमोल मातेले यांनी दिला. जर हा प्रश्न सुटला नाहीतर मीदेखील आपल्यासोबत आंदोलनात उतरेन, असा शब्द जयंत पाटील यांनी दिला असल्याचे मातेले यांनी सांगितले.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content