Homeएनसर्कलजाचक फी वसुलीचा...

जाचक फी वसुलीचा भार हलका होणार?

कोरोना संकटात बेरोजगारी आणि आर्थिक बाजू अस्थिर झाल्याने सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत शाळा, कॉलेज आभासी शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून शंभर टक्के शिक्षणशुल्क, फी वसुली करत आहेत. ही जाचक फी वसुली 50 टक्के कमी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष ऍड. अमोल मातेले यांच्या नेतृत्त्वाखाली लावून धरली आहे.

याप्रश्नी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत राज्य सरकारने शाळा, कॉलेज, अगदी केजी to पीजी स्तरावर शिक्षण शुल्क 50 टक्के कमी करावे, कोरोना संकटात पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. जयंत पाटील यांनी याप्रश्नी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून शाळा, कॉलेजचे शिक्षण शुल्क 50 टक्के कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.

याप्रश्नी तोडगा न निघाल्यास मंत्रालयासमोर सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे अमोल मातेले यांनी दिला. जर हा प्रश्न सुटला नाहीतर मीदेखील आपल्यासोबत आंदोलनात उतरेन, असा शब्द जयंत पाटील यांनी दिला असल्याचे मातेले यांनी सांगितले.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content