Homeन्यूज अँड व्ह्यूजबाबा सिद्दीकी यांना...

बाबा सिद्दीकी यांना उंचावरून टिपले?

 अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येची जागा व आजूबाजूचा परिसर पाहता हल्लेखोरांना बाबा जणू ‘आहेरा’सारखेच आणून दिले, असा दाट संशय येण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे असे खेरवाडी परिसरात फिरले असताना वाटले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा आपले पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या पक्ष कार्यालयातून बाहेर रस्त्यावर चालत येऊन गाडीत बसायला जात असताना हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. एक पोटावर, एक छातीवर व एक डोक्यात. आता राजकीय पक्षाचा नेता म्हटला की, आजूबाजूला दोन-चार कार्यकर्ते तरी असणारच. म्हणजे ते सेमीगराड्यात असणारच. समजा कितीही नेमबाज शूटरने नेम धरला तरी एखादी गोळी आजूबाजूच्या लोकांना लागली असती, निदान चाटून तरी गेली असती. आम्ही हे अनुमान कार्यालयात बसून काढलेले नाही तर जेमतेम 20 /22 पावलांच्या रस्त्यावर तसेच परिसरात किमान दीड तास फेरफटका मारल्यावर सामान्य माणसाला जे समजते त्यावरून काढलेले आहे.

सिद्दीकी

हा पोलिसांच्या माहितीला छेद देण्याचा प्रयत्न मुळीच नाही. तो परिसर व तो रस्ता नेहमीच गर्दीचा असतो आणि त्यादिवशी देवींची यात्रा काढणार असल्याने गर्दीत मोठी वाढ होती. याचा अर्थ अधिक स्पष्ट आहे की, गर्दीचा माहोल असताना केवळ बाबा यांनाच सर्व गोळ्या कशा लागतात? म्हणजेच गोळ्या शेजारून वा आजूबाजूने झाडलेल्या नसाव्यात. दूरवरून वा काहीशा उंचावरून या गोळ्या झाडल्या गेल्या असाव्यात असे वाटते. उंचावरून झाडण्यासाठी हल्लेखोरांना अर्धवट पुनर्वसन झालेल्या दोन इमारती पक्ष कार्यालयासमोरच उभ्या राहिलेल्या आहेत. या इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या वा अन्य माजल्यांवर उभे राहून अचूक नेम साधला गेला असावा असा अंदाज आहे.

शिवाय काहीशा दूरवरून केलेला हा हल्ला नेमका त्यांच्या शरीरावरच कसा होतो याचाही विचार करणे गरजेचे आहे. बाबांना एकटे बाजूला करून हल्लेखोरांना ते एकटेच सापडतील असा कट तर कुणी केला नव्हता ना? फॉरेन्सिक अहवाल यावर प्रकाश पाडेलच. पण सामान्य माणूस म्हणून आम्हाला हा प्रश्न सतावत आहे. झिशान यांच्या पक्ष कार्यालयासमोर मधुकरराव सरपोतदार यांच्या कामगार संघटनेचे व श्रीकांत सरमळकर प्रतिष्ठानचे कार्यालय आहे. खेरवाडीतील हा रस्ता त्या मानाने छोटाच आहे. हा रस्ता छोटा असल्यानेच व केवळ बाबा यांनाच सर्व गोळ्या लागण्याने हे प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस हल्लेखोरांना सहाय्य करणाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे सांगत असले तरी त्यांना सहआरोपी समजले जाईल यात शंका नाही. मग या संशयितानीच बाबांना हल्लेखोरांसमोर अलगद उभे केले असे मानावे का?

इक्बाल मिरचीशी संबंध?

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शेहजिन सिद्दीकी या पूर्वाश्रमीच्या अलका बिंद्रा असून त्या कथित आरोपी रणजित बिंद्रा यांच्या भगिनी आहेत. रणजित बिंद्रा यांना इक्बाल मिरचीबरोबर अवैध धंद्यात भागीदारी असल्याच्या आरोपवरून अटक करण्यात आली होती. रणजित बिंद्रा यांच्या सनब्लिंक रियल इस्टेट या कंपनीत मिरचीचे कोट्यवधी रुपये गुंतवण्यात आल्याचा इडीचा आरोप आहे. शिवाय बाबा यांनी निर्मल नगर परिसर व बांद्रा पश्चिम येथे काही जमिनी बळकावल्याचाही आरोप स्थानिक जनतेच्या चर्चेत होत आहे.

Continue reading

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...

अंबरीश मित्रा, दुर्गाबाईंच्या नावाने ‘हुंदका’ काढलास म्हणून….

अंबरीश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, अभ्यासू माणूस!आतापर्यंत कधीच कोणत्या वादात पडला नाही, पडण्याची गरजही नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो काही काळ करंजिया यांच्या 'डेली' या इंग्रजी दैनिकात पत्रकारिता करत होता त्यावेळेपासून ओळख व मैत्री आहे. तो मुंबई महापालिकेत यायचा...

बांगलादेशींना हाकलायचंय? मग, वंदे भारतने दिल्ली गाठा…

सध्या मुंबई विभागीय विकास प्राधिकरणात म्हणेच MMRA मध्ये हो, बिचकून जाऊ नका; बांगलादेशी बेकायदा नागरिकांच्या विषयाला नको इतके महत्त्व दिले जात असल्याचे वाटत आहे. नको इतके इतक्यासाठीच म्हटले की, जी मंडळी बांगलादेशींविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचेच सरकार केंद्रात व...
Skip to content