Homeबॅक पेजखोट्या महारेरा क्रमांकाने...

खोट्या महारेरा क्रमांकाने घरांची विक्री, ३ महिन्यांत चौकशी!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील इमारतींना महारेराचा बनावट क्रमांक देऊन घरांची विक्री केल्याप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सुरू असलेली चौकशी तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल. त्याचबरोबर महारेरा प्राधिकरणाची रिक्त असलेली दोन पदे लवकरच भरली जातील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत विचारलेल्या तारांकित प्रश्नावरील उत्तरात दिली.

ठाण्यातील कळवा, मुंब्रा, दिवा, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील २७ गावे आणि भिवंडीलगत खारबाव परिसरात उभ्या असलेल्या बेकायदा इमारतींमधील सदनिकांची विक्री, तसेच मनाई असतानाही या इमारतीतील सदनिकांची दुय्यम निबंधकांकडून झालेली दस्तनोंदणी आदींबाबत निरंजन डावखरे, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आदी सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सविस्तरपणे माहिती दिली.

महारेरा हा कायदा ग्राहकांच्या संरक्षणासाठी मे २०१७ मध्ये आला. पण त्याच्या अंमलबजावणीत असलेल्या ढिलाईचा बिल्डरांकडून फायदा घेतला जात आहे. राज्यातील १००७ बिल्डरांच्या ६२४ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे जप्तीचे आदेश दिले गेले. तर स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून केवळ १०५ कोटींची वसुली झाली. ठाणे जिल्ह्यात १४० प्रकल्पांकडून ६० कोटी रक्कम वसूल करावयाची आहेत. पण त्यांच्याकडून केवळ १ कोटी ७७ लाख रुपये वसूल झाले, याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले. महारेरा प्राधिकरणाकडे वर्षभरात ६ हजार ३९० प्रकरणे प्रलंबित आहेत. अनेक सुनावण्या `नॉट बीफोर मी’ म्हणून टाळल्या जातात. त्याचबरोबर महारेरा प्राधिकरणाकडील दोन रिक्त पदे भरण्याची मागणी त्यांनी केली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील ६५ बांधकामांवर महारेराचा बनावट क्रमांक वापरण्यात आला. त्यात दोन हजार ७८४ ग्राहकांकडून घरखरेदी केली गेली. या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नगर विकास विभागाकडून विचार केला जात आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री सावे यांनी दिली. या प्रकरणी दुय्यम निबंधकांचा पदभार काढून घेण्यात आला असला, तरी त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देशभरातील महारेरा प्राधिकरणाच्या प्रमुखांची महिनाभरापूर्वी पुणे येथे बैठक झाली होती. या बैठकीत महारेरा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत येणाऱ्या अडचणी व उपायांबाबतचा अहवाल महाराष्ट्रातील महारेराचे अध्यक्ष अजय मेहता यांच्याकडून मागविण्यात आला आहे. त्यातील शिफारशींनुसार कायद्यात बदलासाठी पुढाकार घेतला जाईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content