Homeन्यूज अँड व्ह्यूजमहागाई शिगेला! 'आनंदाचा...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. ‘दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे शीर्षक त्याला होते. हे सर्व नॉर्मलच होतं. पण आता या घडीला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांचे उत्पन्नाचे आकडे अनायासे हाती लागत आहेत. सर्वसामान्यांचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी वा काही ठिकाणी तर न्यूनतम श्रेणीत मोडत असताना आपल्या भावी लोकप्रतिनिधीचे सध्याचे उत्पन्न मात्र गेल्या दहा-बारा वर्षांत दहा-बारा पटीने वाढलेले त्यांनीच कबूल केलेले आहे.

नाहीतर सगळेच नेते सांगत असतात ‘झोली लेके आया हु..’ हिंदूने केलेल्या पाहणीत केवळ दोन वेळचे जेवण कसे व किती महागले आहे याचा तक्ताच दिलेला आहे. डाळभात जेवायचे म्हटले तरी डाळीचा भाव सामान्य माणसाच्या आवाक्यात नाही. वास्तविक डाळीचे महत्त्व सर्व जेवणात असते. या डाळी अनेक ठिकाणी १५० रु किलोच्या पुढे गेलेल्या आहेत. तेलाचे भाव तर कढीतल्या गरम तेलाप्रमाणे कडकडत आहेत. कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो या इतर वस्तूंच्या भावाचे तर विचारूच नका! उलट लोकप्रतिधीच्या उत्पनात मात्र ‘कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे परदेशाकडे..’ अशी अवस्था आहे.

निवडणूक आयोगाची ही कमाल आहे. राज्यातील गरिबांसाठीचा ‘आनंदाचा शिधा’ ही काही नवीन योजना नाही. तरीही कोट्यवधी गरीब जनतेला या दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ मिळणारच नाही. कुठल्या बोरुबहाद्दराने हा ‘आनंद’ रोखला याची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तातडीने शोधून काढावे व त्याला हाकलून द्यावे, अशी जनतेची भावना आहे .यावर विंदा कारंदीकर आठवतात-

“जळताना जळो। निदान ही भूक

प्रार्थना ही एक। करा आता

नागड्यानो उठा। उगवा रे सूड

देहाचीच चूड। पेटवोनी”

छायाचित्र मांडणी- प्रवीण वराडकर

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content