Homeन्यूज अँड व्ह्यूजमहागाई शिगेला! 'आनंदाचा...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. ‘दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे शीर्षक त्याला होते. हे सर्व नॉर्मलच होतं. पण आता या घडीला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांचे उत्पन्नाचे आकडे अनायासे हाती लागत आहेत. सर्वसामान्यांचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी वा काही ठिकाणी तर न्यूनतम श्रेणीत मोडत असताना आपल्या भावी लोकप्रतिनिधीचे सध्याचे उत्पन्न मात्र गेल्या दहा-बारा वर्षांत दहा-बारा पटीने वाढलेले त्यांनीच कबूल केलेले आहे.

नाहीतर सगळेच नेते सांगत असतात ‘झोली लेके आया हु..’ हिंदूने केलेल्या पाहणीत केवळ दोन वेळचे जेवण कसे व किती महागले आहे याचा तक्ताच दिलेला आहे. डाळभात जेवायचे म्हटले तरी डाळीचा भाव सामान्य माणसाच्या आवाक्यात नाही. वास्तविक डाळीचे महत्त्व सर्व जेवणात असते. या डाळी अनेक ठिकाणी १५० रु किलोच्या पुढे गेलेल्या आहेत. तेलाचे भाव तर कढीतल्या गरम तेलाप्रमाणे कडकडत आहेत. कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो या इतर वस्तूंच्या भावाचे तर विचारूच नका! उलट लोकप्रतिधीच्या उत्पनात मात्र ‘कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे परदेशाकडे..’ अशी अवस्था आहे.

निवडणूक आयोगाची ही कमाल आहे. राज्यातील गरिबांसाठीचा ‘आनंदाचा शिधा’ ही काही नवीन योजना नाही. तरीही कोट्यवधी गरीब जनतेला या दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ मिळणारच नाही. कुठल्या बोरुबहाद्दराने हा ‘आनंद’ रोखला याची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तातडीने शोधून काढावे व त्याला हाकलून द्यावे, अशी जनतेची भावना आहे .यावर विंदा कारंदीकर आठवतात-

“जळताना जळो। निदान ही भूक

प्रार्थना ही एक। करा आता

नागड्यानो उठा। उगवा रे सूड

देहाचीच चूड। पेटवोनी”

छायाचित्र मांडणी- प्रवीण वराडकर

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content