Homeडेली पल्स५ महिन्यांत भारताच्या...

५ महिन्यांत भारताच्या आंबा निर्यातीत झाली 19%ने वाढ!

भारताच्या कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात प्राधिकरण अर्थात अपेडा, तसेच वाणिज्य व उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारताने चालू (2023-24) आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत आंबा निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली असून निर्यात केलेल्या आंब्यांचे मूल्य 47.98 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. गेल्या वर्षीच्या 40.33 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत या वर्षात भारताने आंबा निर्यातीत 19% वाढ नोंदवली आहे. 

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व  कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात प्राधिकरण अर्थात अपेडा, यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारताने गेल्या 2022-23 या आर्थिक वर्षात 48.53 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे 22963.78 मेट्रिक टन आंबे निर्यात केले होते. तर चालू (2023-24) आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत 47.98 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे 27330.02 मेट्रिक टन आंबे निर्यात केले आहेत. 2023 मधील हंगामात आंब्यांची निर्यात वाढवण्याच्या हेतूने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व अपेडा (APEDA) ने अमेरिकेच्या कृषी विभागाच्या पशु व वनस्पती आरोग्य परीक्षण सेवेच्या (APHIS) निरीक्षकांना वाशी, नाशिक, बेंगळुरू व अहमदाबाद येथील इरेडिएशन केंद्रात आमंत्रित केले होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023-24 या वर्षात भारताने अमेरिकेला केलेल्या आंबा निर्यातीत 19% वाढ नोंदवली आहे. तसेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच 2043.60 मेट्रिक टन आंबे निर्यात केले आहेत.

केंद्र सरकारच्या संस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे भारताने अमेरिकेसह जपानला 43.08 मेट्रिक टन, न्यूझीलंडला 110.99 मेट्रिक टन, ऑस्ट्रेलियाला 58.42 मेट्रिक टन आणि दक्षिण आफ्रिकेला 4.44 मेट्रिक टन आंब्यांची निर्यात केली आहे. चालू आर्थिक वर्षात आंब्यांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2023 सालच्या हंगामात भारताने 41 देशांना आंबे निर्यात केले असून त्यात इराण, मॉरिशस आणि नायजेरियासारख्या नव्या बाजारपेठांचा समावेश आहे. 

Continue reading

देशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक सेवा कायदा लागू!

आखातात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात अत्यावश्याक वस्तू कायदा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा अधिनियम १९५५, हा कायदा लागू केल्यानंतर घराघरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजांविरोधात कठोर कारवाई केली...

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी...

श्री गणेश आखाड्यात मान्यवरांचा गौरव

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्यावतीने मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक तसेच विविध स्पर्धांत पदक पटकावलेल्या आखाड्याच्या कुस्तीगिरांचा गौरव सोहळा उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला. सर्वांना फेटे बांधून, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन...
Skip to content