Homeबॅक पेजशुक्रवारपासून नागपूरमध्ये भारतीय...

शुक्रवारपासून नागपूरमध्ये भारतीय लष्कराची ‘शौर्य संध्या’!

भारतीय लष्कराच्या नागपूर येथील उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात-उमंग सबएरियातर्फे नागपूरमधील मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे येत्या 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान ‘शौर्य संध्या’ या भारतीय लष्कराच्या संदर्भात असणाऱ्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना भारतीय लष्कराच्या शौर्य कार्यवाही, शस्त्रास्त्र प्रदर्शन, भारतीय लष्कराच्या विविध तुकड्यांतर्फे केले जाणाऱ्या प्रात्यक्षिकांची प्रदर्शन बघायला मिळणार आहेत, अशी माहिती उमंग सब एरीयाचे जनरल ऑफिसर इन कमांड मेजर जनरल एस. के. विद्यार्थी यांनी काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी गार्ड रेजिमेंटल सेंटरचे ब्रिगेडीअर के. आनंद, रक्षा जनसंपर्क अधिकारी रत्नाकर सिंग उपस्थित होते.

यामध्ये भारतीय लष्कराच्या ताफ्यात असलेले विविध प्रकारचे रणगाडे, हेलिकॉप्टर, शस्त्रास्त्रे अभियांत्रिकी उपकरणे त्याचप्रमाणे विविध लष्करी संग्रहालयाचे प्रदर्शन दालने असणार आहेत. उद्घाटन समारंभ 2 फेब्रुवारीला संध्याकाळी 4.30 ते 6 या वेळेत होणार असून या दरम्यान प्रेक्षकांना विविध प्रकारच्या लष्कराच्या कार्यवाही यामध्ये मोटरसायकल डिस्प्ले, आर्मी डॉग शो, विशेष पथकांच्या कार्यवाही, आर्मी सिंफनी बॅंड, ड्रोन डिस्प्ले, फ्लाय पास्ट यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

3 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 वाजल्यापासून हे प्रदर्शन सामान्य जनतेकरीता खुले राहणार आहे. तरी या प्रदर्शनाला शालेय विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट द्यावी आणि लष्कराकडे भविष्यातील एक परिपूर्ण करिअर संधी आणि देशसेवेची एक अभुतपूर्व संधी म्हणून पहावे असे आवाहन मेजर जनरल एस के विद्यार्थी यांनी केले आहे.

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content