Homeबॅक पेजशुक्रवारपासून नागपूरमध्ये भारतीय...

शुक्रवारपासून नागपूरमध्ये भारतीय लष्कराची ‘शौर्य संध्या’!

भारतीय लष्कराच्या नागपूर येथील उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात-उमंग सबएरियातर्फे नागपूरमधील मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे येत्या 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान ‘शौर्य संध्या’ या भारतीय लष्कराच्या संदर्भात असणाऱ्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना भारतीय लष्कराच्या शौर्य कार्यवाही, शस्त्रास्त्र प्रदर्शन, भारतीय लष्कराच्या विविध तुकड्यांतर्फे केले जाणाऱ्या प्रात्यक्षिकांची प्रदर्शन बघायला मिळणार आहेत, अशी माहिती उमंग सब एरीयाचे जनरल ऑफिसर इन कमांड मेजर जनरल एस. के. विद्यार्थी यांनी काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी गार्ड रेजिमेंटल सेंटरचे ब्रिगेडीअर के. आनंद, रक्षा जनसंपर्क अधिकारी रत्नाकर सिंग उपस्थित होते.

यामध्ये भारतीय लष्कराच्या ताफ्यात असलेले विविध प्रकारचे रणगाडे, हेलिकॉप्टर, शस्त्रास्त्रे अभियांत्रिकी उपकरणे त्याचप्रमाणे विविध लष्करी संग्रहालयाचे प्रदर्शन दालने असणार आहेत. उद्घाटन समारंभ 2 फेब्रुवारीला संध्याकाळी 4.30 ते 6 या वेळेत होणार असून या दरम्यान प्रेक्षकांना विविध प्रकारच्या लष्कराच्या कार्यवाही यामध्ये मोटरसायकल डिस्प्ले, आर्मी डॉग शो, विशेष पथकांच्या कार्यवाही, आर्मी सिंफनी बॅंड, ड्रोन डिस्प्ले, फ्लाय पास्ट यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

3 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 वाजल्यापासून हे प्रदर्शन सामान्य जनतेकरीता खुले राहणार आहे. तरी या प्रदर्शनाला शालेय विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट द्यावी आणि लष्कराकडे भविष्यातील एक परिपूर्ण करिअर संधी आणि देशसेवेची एक अभुतपूर्व संधी म्हणून पहावे असे आवाहन मेजर जनरल एस के विद्यार्थी यांनी केले आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content