Homeन्यूज अँड व्ह्यूजभारतीय हवाई दलातल्या...

भारतीय हवाई दलातल्या मिग-21ची निवृत्तीकडे वाटचाल सुरू!

उत्तरलाई येथील हवाई तळावर 30 ऑक्टोबर 23 रोजी आयोजित एका समारंभाद्वारे भारतीय हवाई दलात नवीन विमानांचा औपचारिक समावेश करण्यात आला. या समारंभात मिग-21 आणि सुखोई-30 एमकेआय या विमानांनी एकत्रित हवाई कसरती केल्या. या माध्यमातून मिग-21 विमानांच्या स्क्वाड्रनने शेवटचे उड्डाण केले. या समारंभाला विविध लष्करी आणि नागरी मान्यवरांची उपस्थिती होती. भारतीय हवाई दल आता मिग-21 विमानांच्या केवळ दोन स्क्वाड्रनचे परिचालन करेल, हे या स्क्वाड्रनचे सुखोई-30 एमकेआय मध्ये रूपांतर सूचित करते. भारतीय हवाई दल 2025 पर्यंत मिग-21 विमानांचा वापर टप्प्याटप्प्याने थांबवण्यासाठी वचनबद्ध आहे.

भारतीय हवाई दलाची उत्तरलाई (बाडमेर) हवाई तळावर स्थित क्रमांक 4 ची स्क्वाड्रन (ऊरिअल्स) मिग-21 मधून सुखोई-30 एमकेआयमध्ये रूपांतरित करण्यात आली असून 1966 पासून मिग-21 चे परिचालन करणाऱ्या स्क्वाड्रनचा इतिहासातील निर्णायक क्षण आहे. मिग-21 हे भारतीय हवाई दलाच्या सेवेतील पहिले स्वनातीत (सुपरसॉनिक) लढाऊ विमान आहे आणि 1963 मध्ये हवाई दलात या विमानाचा समावेश झाला होता, तेव्हापासून सर्व मोठ्या युद्धांमध्ये या विमानाचा सहभाग होता. हा बदल भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि त्याचवेळी देशाच्या अवकाशाचे रक्षण करण्यासाठी अतूट वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

Continue reading

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...
Skip to content