Homeटॉप स्टोरीदेशातील फेरीवाले होणार...

देशातील फेरीवाले होणार डिजिटल!

पीएम स्वनिधी योजनेला सहा महिने पूर्ण झाल्याबद्दल नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व वेंडर्स ऑफ इंडियाने एका देशव्यापी वेबिनारचे आयोजन केले होते. या वेबिनारमध्ये भारत सरकारचे सहसचिव संजय कुमार, बँकांचे वरिष्ठ अधिकारी, देशभरातील फेरीवाल्यांसाठी काम करणाऱ्या संस्था व संघटना तसेच देशभरातून लाखो फेरीवाल्यांनी उपस्थिती दर्शविली होती. फेरीवाल्यांना पीएम स्वनिधी योजनेबाबत जास्तीतजास्त माहिती करून देणे, त्यांच्या समस्या केंद्र शासनापर्यंत पोहोचवून त्यावर नियोजनात्मक उपाय शोधणे हे या वेबिनारचे उद्दिष्ट होते.

पीएमस्वनिधी योजनेला देशामध्ये भरपूर चांगला प्रतिसाद मिळालेला असून आतापर्यंत देशभरातून एकूण ३२ लाख ११ हजार ९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १६ लाख ८७ हजार ४९१ अर्ज मंजूर झाले असून आतापर्यंत एकूण १२ लाख ३२ हजार ५२४ फेरीवाल्यांना कर्ज मिळाले आहे. या योजनेअंतर्गत युनिअन बँक ऑफ इंडियाने अद्यापपावेतो एकूण २ लाख३१ हजार फेरीवाल्यांना २ कोटी ३१ लाखांचे कर्ज दिल्याची माहिती बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक ए. के. गोविंद यांनी यावेळी दिली.


कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये या योजनेला पुरेसे यश मिळालेले नाही. महाराष्ट्रामध्ये केवळ ८२,७६८ फेरीवाल्यांना व र्नाटकमध्ये केवळ ४६,१६९ फेरीवाल्यांना कर्ज मिळाले आहे. त्याबाबत फेरीवाल्यांच्या संस्था, संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये केवळ ४१२३ फेरीवाल्यांना तर वसई-विरारमध्ये केवळ १८९५ फेरीवाल्यांना कर्ज मिळाले आहे. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान जनजागृतीची उणिव, बँक अधिकाऱ्यांचे असहकाराचे वर्तन, कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेत असलेली दिरंगाई यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये योजनेला आव्हान येत असल्याचे मत उपस्थितांनी मांडले.

आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सहसचिव संजय कुमार यांनी भारत सरकारच्या ‘मै भी डिजिटल” या नवीन उपक्रमाबाबत माहिती दिली. ज्यानुसार फेरीवाल्यांना, विशेष करून जे पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना या उपक्रमामध्ये सहभागी केले जाणार असून बँकांकडून डिजिटीलायझेशनबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे देशभरातील फेरीवाल्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांचालाभ त्यांना मिळवून देण्यासाठी फेरीवाल्यांचे त्यांच्या कुटुंबासमवेत एक सर्वेक्षण केले जाईल व त्यानंतर त्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल की नाही याचे परीक्षण केले जाईल. या योजनांमध्ये सुरक्षा बिमा योजना, जन धन योजना, जननी सुरक्षा योजना, आयुष्यमान भारत इत्यादी योजनाचा समावेश करण्यात आलेला आहे.

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content