Homeटॉप स्टोरीदेशातील फेरीवाले होणार...

देशातील फेरीवाले होणार डिजिटल!

पीएम स्वनिधी योजनेला सहा महिने पूर्ण झाल्याबद्दल नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व वेंडर्स ऑफ इंडियाने एका देशव्यापी वेबिनारचे आयोजन केले होते. या वेबिनारमध्ये भारत सरकारचे सहसचिव संजय कुमार, बँकांचे वरिष्ठ अधिकारी, देशभरातील फेरीवाल्यांसाठी काम करणाऱ्या संस्था व संघटना तसेच देशभरातून लाखो फेरीवाल्यांनी उपस्थिती दर्शविली होती. फेरीवाल्यांना पीएम स्वनिधी योजनेबाबत जास्तीतजास्त माहिती करून देणे, त्यांच्या समस्या केंद्र शासनापर्यंत पोहोचवून त्यावर नियोजनात्मक उपाय शोधणे हे या वेबिनारचे उद्दिष्ट होते.

पीएमस्वनिधी योजनेला देशामध्ये भरपूर चांगला प्रतिसाद मिळालेला असून आतापर्यंत देशभरातून एकूण ३२ लाख ११ हजार ९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १६ लाख ८७ हजार ४९१ अर्ज मंजूर झाले असून आतापर्यंत एकूण १२ लाख ३२ हजार ५२४ फेरीवाल्यांना कर्ज मिळाले आहे. या योजनेअंतर्गत युनिअन बँक ऑफ इंडियाने अद्यापपावेतो एकूण २ लाख३१ हजार फेरीवाल्यांना २ कोटी ३१ लाखांचे कर्ज दिल्याची माहिती बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक ए. के. गोविंद यांनी यावेळी दिली.


कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये या योजनेला पुरेसे यश मिळालेले नाही. महाराष्ट्रामध्ये केवळ ८२,७६८ फेरीवाल्यांना व र्नाटकमध्ये केवळ ४६,१६९ फेरीवाल्यांना कर्ज मिळाले आहे. त्याबाबत फेरीवाल्यांच्या संस्था, संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये केवळ ४१२३ फेरीवाल्यांना तर वसई-विरारमध्ये केवळ १८९५ फेरीवाल्यांना कर्ज मिळाले आहे. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान जनजागृतीची उणिव, बँक अधिकाऱ्यांचे असहकाराचे वर्तन, कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेत असलेली दिरंगाई यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये योजनेला आव्हान येत असल्याचे मत उपस्थितांनी मांडले.

आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सहसचिव संजय कुमार यांनी भारत सरकारच्या ‘मै भी डिजिटल” या नवीन उपक्रमाबाबत माहिती दिली. ज्यानुसार फेरीवाल्यांना, विशेष करून जे पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना या उपक्रमामध्ये सहभागी केले जाणार असून बँकांकडून डिजिटीलायझेशनबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे देशभरातील फेरीवाल्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांचालाभ त्यांना मिळवून देण्यासाठी फेरीवाल्यांचे त्यांच्या कुटुंबासमवेत एक सर्वेक्षण केले जाईल व त्यानंतर त्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल की नाही याचे परीक्षण केले जाईल. या योजनांमध्ये सुरक्षा बिमा योजना, जन धन योजना, जननी सुरक्षा योजना, आयुष्यमान भारत इत्यादी योजनाचा समावेश करण्यात आलेला आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content