Homeडेली पल्स‘समृद्धी परिषद’ अभियानाचे...

‘समृद्धी परिषद’ अभियानाचे आयआयटी रोपार येथे उद्घाटन!

डीपटेक अर्थात गहन तंत्रज्ञानाला गती देणाऱ्या ‘समृद्धी परिषद’ या अभियानाचे उद्घाटन पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी आणि जल तंत्रज्ञानातील अभिनव तंत्रज्ञानाला गती देणारा समृद्धी हा कार्यक्रम बाजारपेठ, संशोधन, नवोन्मेष आणि विकास यांन धोरणात्मक पद्धतीने गती देणारा म्हणजे आयसीपीएस स्टार्ट अप उद्योगांसाठी सुरु करण्यात आलेला व्यापक उपक्रम आहे. आंतरशाखीय सायबर-भौतिक प्रणालींवर (एनएम-आयसीपीएस) आधारित राष्ट्रीय अभियानाअंतर्गत उभारण्यात आलेल्या आयआयटी रोपारमधील iHub AwaDH या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष केंद्राने हा कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमात बोलताना, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (डीएसटी) विभागाचे ज्येष्ठ सल्लागार तसेच विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाचे सचिव डॉ.अखिलेश गुप्ता यांनी भारताला तंत्रज्ञानाच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्यासाठी एनएमआयसीपीएस करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. आयसीपीएसशी संबंधित एनएमच्या अभियान संचालक डॉ.एकता कपूर यांनी कृषीविषयक पायाभूत सुविधा, आरोग्य, संरक्षण आणि पर्यावरण यांसारख्या क्षेत्रांमध्ये सीपीएस तंत्रज्ञानविषयक हस्तक्षेपांना चालना देणाऱ्या या अभियानाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला.

देशभरात एनएमआयपीएसच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्यात डीएसटी बजावत असलेली महत्त्वाची भूमिका या कार्यक्रमात अधोरेखित झाली. या अभियानाने 311 विविध तंत्रज्ञाने, 549 तंत्रज्ञानविषयक प्रकल्प यांच्या निर्मितीला मदत केली तसेच 1613 सीपीएस संशोधन केंद्रांची उभारणी करून 60000 हून अधिक सीपीएस कौशल्य केंद्रांच्या निर्मितीत योगदान दिले.

आयआयटी रोपार मधील iHub AwaDH या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला 46 गुंतवणूक भागीदारांचे पाठबळ लाभले असून 50 पेक्षा जास्त परीक्षक सदस्यांनी स्टार्ट अप उद्योगांचे मूल्यांकन करून त्यांना मार्गदर्शन केले.

Continue reading

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...
Skip to content